Friday 20 August 2021

आर्यभट्ट



१९७५ साली भारताचा पहिला उपग्रह सोवियेत युनियन च्या मदतीने अवकाशात झेपावला आणि महान भारतीय गणित तज्ज्ञ आणि खगोलशात्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव उपग्रहाला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा एक लहानसा प्रयत्न केला. 

आजच्या पिढीला आर्यभट्ट आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात नव्याने ओळख करून द्यावी लागेल, कारण इतिहासाच्या पानांवर आर्यभट्ट आणि त्यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वाना जागा उरलेली दिसत नाही. काही ठिकाणी तुटपुंजा उल्लेख आढळतो.

आर्यभट्टांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसे पुरावे उपलब्ध नसल्याने अंदाजे इसवीसन पूर्व ४७६ साली त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यांनी त्यांच्या ७४ वर्षाच्या जीवनकाळात तत्कालीन प्रस्थापित विचारधारे सोबत न वाहून जाता अनके गूढ रहस्यांची उकल स्वतः केली. त्यांचे कार्य पाहिल्यास ते त्या काळातील नाहीच असे वाटू लागते.


जर आज तुम्हाला सांगितले कि पृथ्वी सूर्याभोवती किती वेळात प्रदक्षिणा पूर्ण करते याचे उत्तर स्वतः हुन शोधा, तर कदाचित आपण विचारात पडू. मात्र आज पासून दोन हजार वर्षांपूर्वी आणि आपण शाळेत शिकलेल्या कोपर्निकस ने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगण्याच्या एक हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टाने पृथ्वी प्रदिक्षिणेचा जो काळ सांगितलं तो  आहे, ३६५.२५८५८ दिवस आणि आजची अद्ययावत उपकरणे आणि वापरून मोजलेला काळ आहे ३६५.२५६३६ दिवस, म्हणजे ३ मिनिटे २० सेकंदांचा फरक. तसेच आर्यभट्टाने मोजलेला एक दिवसाचा कालावधी होता २३ तास 

५६ मिनिटे आणि ४.१ सेकंड्स, आज आधुनिक पद्धतीने गणला गेलेला काळ आहे २३ तास ५६ मिनिटे ४.०९१ सेकंड, आत्ता आपणच शोधावे नेमका किती मायक्रोसेकंदांचा फरक आहे ते. दोन हजार वर्षांपूर्वी गुप्त काळातील समृद्ध पाटलीपुत्र या राजधानीत राहत आणि शिष्याना आपली शिकवण देत आधुनिक गणित आणि खगोलशास्त्रालाही सहज सोपे न वाटणारे त्रिकोणमिती आणि बीजगणितातील संकल्पनांचाअचूक शोध घेतला. ग्रहणे आणि इतर ग्रहांचे सूर्याभोवती फिरण्याची गणिते मांडलीत, पाय ची किंमत निर्धारित केली, शून्याचा वापर प्रचलित केला.

त्याकाळी आपला सिद्धांत आणि शोध मोजक्या शब्दांत श्लोकबद्ध करण्याची उपयुक्त रीत प्रचलित असल्याने आर्यभट्टाने आपले संशोधन श्लोकबद्ध केले. ज्यातील अनेक रचना आज काळाच्या ओघात नष्ट झाल्या असून १०८ श्लोकांचा आर्यभटीय आणि आर्यसिद्धांत हे ग्रंथ आजही अभ्यासास उपलब्ध आहेत. अनेक परकीय विद्यापीठांनी आर्यभट्टाच्या कार्याची दाखल घेत अनेक शोध निबंध प्रसिद्ध केलेलं आहेत आपण ते जरूर अभ्यासावे. आणि प्राचीन मात्र प्रगत भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यावी.

Wednesday 18 August 2021

प्राचीन विज्ञान: भाग एक.


प्राचीन विज्ञान

विद पासून उगम पावलेल्या वेद शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असाच आहे जसा scientia ह्या लॅटिन शब्दापासून तय्यार झालेल्या सायन्स शब्दाचा आहे. मात्र वेदांची शात्रोक्त बांधणी आधुनिक विज्ञानाच्या उगमाच्या हजारो वर्षां पूर्वी च झाली होती. आधुनिक विज्ञान आणि पौर्वात्य आत्मिक ज्ञान हे परस्पर विरोधी मानावेत कि एकाच वृक्षाच्या दोन फांद्या म्हणाव्यात. एकाला तार्किक चौकटीतून तर दुसऱ्याला तर्कविसंगतीतून पाहावे काय? याविषयी उहापोह पुढील लेखांमध्ये आपण करूच. किंबहुना ती काळाची गरजच आहे म्हणा. भौतिक शास्त्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ नील्स बोहर, ताओ ऑफ फिज़िक्स (१९७५) या पुस्तकात, “I go to the Upanishad to ask questions.” असे का म्हणतो याचे उत्तर शोधावेच लागेल. प्राचीन विज्ञान लेखांच्या मालिकेच्या माध्यमातून अश्याच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या गेलेल्या वेदांच्या रचनेमागिल कारण थोडक्यात पाहुयात, म्हणजे पुढील अभ्यास सोपा ठरेल. वेद शब्दापासून विद्या म्हणजेच अर्जित ज्ञान, आणि ज्ञानार्जन केलेला व्यक्ती विद्वान असे शब्द रचले गेलेत. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आजच्या काळातील कोणतेही अद्ययावत भौतिक उपकरण अस्तित्वात नव्हते. तेव्हाही मानवाला अनेक प्रश्न पडत असत. मात्र Google  करून उत्तर शोधणे शक्य नसल्यामुळे जीवनाशी संबंधित प्रश्नांची उकल करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करीत आणि अतोनात प्रयत्न करून त्याला जे ज्ञान प्राप्त होई ते आत्मिक ज्ञानावर आधारित असे. म्हणजेच जाणिवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष आकलन केलेले. पुढील पिढीला हे प्राप्त ज्ञान द्यायचे असल्यास तेही प्रत्यक्ष जाणिवेच्या माध्यमातूनच दिले जाई, कोणत्याही प्रकारे निव्वळ विश्वास न ठेवता.

प्रत्येक विषयावर हजारो प्रश्न उपस्थित करून जो पर्यंत समाधानपूर्वक उत्तर मिळत नाही तो पर्यंत कोणतेही सांगितले गेलेलं ज्ञान अर्जित केले जात नसे. जगात क्वचितच कोठे अश्या प्रकारे शिक्षण देण्याची प्रथा असावी.

भारतीय भूमीवर जन्मलेली कोणतीही संकल्पना किंवा तत्वज्ञान अस्तित्ववादाच्या प्रखर परीक्षेतून गेल्यावरच मान्य होत असे. निव्वळ परिकल्पना म्हणून नव्हे. कदाचित पुढे आत्मज्ञानाने प्राप्त झालेले कल्याणकारी आत्मसाक्षात्कार सामान्यांना समजण्यास सोपे आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रतीके आणि गोष्टी च्या स्वरूप सांगितले जाऊ लागले. वेळ आणि अवकाशाचा अल्बर्ट आईन्स्टाईन चा सापेक्षता वादाचा सिद्धांत सुद्धा सामान्यांना गोष्टीरूपात सांगावा लागतो तसेच काहीसे. साक्षात्कारातून साकारलेली आणि मानवोपयोगी शिकवण दीर्घकाळ टिकून राहावी याकरिता प्रथा आणि परंपरा निर्माण केल्या गेल्यात, परंपरा निर्माण होण्यामागील विज्ञान हेच आहे कि, कल्याणकारी गोष्ट परंपरेच्या  स्वरूपात अधिकाधिक पिढ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. ह्याच परंपरांचा संग्रह म्हणजे आधुनिक भाषेततिल धर्माची संकल्पना गणले गेले. मानवी मन स्थिर नसल्याने पुढील काही काळात त्या परंपरांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी समाविष्ट होत गेल्या. मात्र सामाजिक दृष्ट्या लाभकारी असलेल्या कित्येक सर्वसमावेशक आणि कल्याणकारी परंपरा आजही तग धरून. प्राचीन विज्ञान ग्रहण करण्या करीता गरजेची असलेली गुरुशिष्य परंपरा गेल्या ३०० वर्षांत लुप्त होत गेल्यामुळे, जमेल तसा अर्थ देऊन हे ज्ञान पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो, त्यामुळे आधुनिक तर्कसंगत पिढीद्वारे अश्या गोष्टीना भ्रामक मानून त्या हळू हळू दुर्लक्षित केल्या जाऊ लागल्यात.


तर्कसंगत बुद्धी तुमच्या बाह्य प्रगतीकरिता आणि टिकून राहण्याच्या कामात मोलाचे योगदान देते, मात्र अस्तित्वाविषयी जाणून घेण्याच्या प्रयत्नात तर्क अपुरा पडतो. एबीओजेनेसिस ह्या पृथीवरील जीवनाच्या उगमाचा शोध घेणाऱ्या विज्ञानाच्या शाखेमध्ये जीवनाचे उगम स्थान शोधताना सगळे तर्क अपुरे पडून निव्वळ एक जादुई योगायोग म्हणून पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात मानवी लागते. कृष्ण विवर, डार्क energy डार्क मॅटर, ऑबसर्वर पॅराडॉक्स, quantum एंटॅगलमेंट सारख्या आधुनिक विज्ञानाला सतावणाऱ्या अनेक प्रश्नांपुढे तर्कबुद्धी गुढगे टेकते. कारण सर्वत्र प्रस्थापित भौतिक नियम येथे लागू होत नाहीत. मग तर्क विसंगती म्हणजे अज्ञान असे म्हणून ह्या किचकट गणितांना सोडून द्यावे काय? अगदी जसे काही आत्मज्ञानावर आधारित आणि कल्याणकारी परंपरांना अज्ञानी म्हणून हिणवत सोडून दिले गेले? नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आज उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या आधाराव सापडत नसेल तर कदाचित पुढे ज्ञान संवर्धन झाल्यास सापडू शकेल, उदाहरणादाखल. भारतीय संस्कृतीमध्ये ठरावीक वेळेनंतर संपूर्ण उपवास करण्याची प्रथा सामील आहे. हि प्रथा कुणी आणि का सुरु केली असावी याचा काही पुरावा नाही, मात्र कुठेतरी लाभकारी असल्यामुळे ती अजूनही तग धरून आहे. आधुनिक या नावाचे बिरुद मिरवणाऱ्या काहींनी कित्त्येक वर्षे उपवासाची खिल्ली उडवली मात्र एक आधुनिक जपानी cell biologist Yoshinori Ohsumi यांनी २०१६ सालचे नोबेल पारितोषिक उपवास का करावा हे सांगूनच जिंकले. या संदर्भात Intermediate  fasting च्या नावाने बरीचशी माहिती आज इंटरनेट वर उपलब्ध आहे आपण स्वतः च या संदर्भात माहिती मिळवावी आणि संपूर्ण शोध निबंध आणि भारतीय संस्कृतीचा भाग असलेला उपवास या दोन्हींचा 

 अभ्यास करून यांच्यात काही साधर्म्य आहे काय पडताळून पाहावे. एक ना अनेक गोष्टी ज्या आज तुमच्या ज्ञानानुसार कोणत्याही तार्किक चौकटीत बसूशकणार नाहीत मात्र कल्याणकारी आहे, या संस्कृतीने जपलेल्या आहेत, मात्र याची जाणीव होण्याकरिता 

कोणीतरी पाश्चिमात्याने ती तुम्हाला सांगावी लागेल. कारण भारतीय संस्कृती कशी तर्क विसंगत आहे याचा साचेबंद गेल्या दोनशे वर्षांत आपल्या बुद्धीवर साचलेला आहे. मात्र एकी गोष्ट ध्यानी असुदे, कोणतीही गोष्ट 

अभ्यासल्या शिवाय त्याविषयी मत बनवणे हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, आधुनिक संस्कृती असो किंवा प्राचीन संस्कृती असो अंधश्रद्धेला भारतीय भूमीवर थारा नाही. पुढील लेखात आपण अश्याच काही निवडक संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत.

Wednesday 4 August 2021

प्रत्येक क्षण महत्वाचा.

चुकांमधून शिकता येते हि गोष्ट कळायला लागली कि बऱ्याचदा आयुष्य सोपे वाटू लागते. कधीकधी लहान 

गोष्टीसुद्धा  मोठा बोध देऊन जातात. जसे बुद्धिबळाचा खेळ, बुद्धिबळाच्या खेळातून शिकण्यासारख्या तश्या असंख्य गोष्टी आहेत. एक सामना गमावल्यानंतर अशीच एक शिकवण माझ्याही पदरी पडली.

मी निष्णात खेळाडू नाही, मात्र कधी कधी बुद्धिबळ खेळणे मला आवडते. एके सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने खेळत असताना खेळ रंगात आला अन चाल प्रतिचाल करीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी मी आणि माझा प्रतिस्पर्धी एकाग्र होऊन खेळू लागलो. खेळाला वेळेची मर्यादा असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निर्णय घेऊन उपलब्ध सोंगट्यांची उपयुक्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यामुळे बुद्धिबळातील बुलेट प्रकारच्या खेळात फक्त एका मिनिटाच्या वेळेत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना एक वेगळाच थरार प्राप्त होतो. प्रयत्न करून हि हा सामना मी ०.००.१ मिनिटे म्हणजेच एका सेकंदाच्या सहाव्या भागाच्या फरकाने गमावला.

 सामना संपल्यावर विचारचक्र सुरू झाले. अनेक प्रसंगात आपल्याजवळ खूप वेळ असूनदेखील योग्य  नियोजन करायला आपण फार वेळ लावतो तसेच जिथे लवकर निर्णय घेता येतील अश्या प्रसंगातही गरज नसताना आपण 

खूप विचार करत बसतो. वेळ मात्र सतत निसटून जात असतो...

प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखून त्याचे नियोजन आणि लवकर अचूक निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याला जिंकावत असते, आयुष्यातही. कौशल्य असूनदेखील वेळेचे महत्व न ओळखल्यास आणि निर्णय घेण्यास दिरंगाई करीत बसल्यास काही उपयोग होत नाही. जसे वर नमूद केलेल्या खेळात माझ्या प्रतिस्पर्ध्याने फक्त काही मिलिसेकंद कमी घेतलेत आणि तो जिंकू शकला. प्रत्येक क्षण महत्वाचा असून त्याचे महत्व मात्र आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही आणि हाच अजाणतेपणा वेळेचा सदुपयोग करण्याच्या कामातील सर्वात मोठा अडसर ठरतो. 

वेळेचे महत्व वेळीच ओळखावे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

चुकांमधून शिकता येते हि गोष्ट कळायला लागली कि बऱ्याचदा आयुष्य सोपे वाटू लागते. कधीकधी लहान 

गोष्टीसुद्धा  मोठा बोध देऊन जातात. जसे बुद्धिबळाचा खेळ, बुद्धिबळाच्या खेळातून शिकण्यासारख्या तश्या असंख्य गोष्टी आहेत. एक सामना गमावल्यानंतर अशीच एक शिकवण माझ्याही पदरी पडली.

मी निष्णात खेळाडू नाही, मात्र कधी कधी बुद्धिबळ खेळणे मला आवडते. एके सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने खेळत असताना खेळ रंगात आला अन चाल प्रतिचाल करीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी मी आणि माझा प्रतिस्पर्धी एकाग्र होऊन खेळू लागलो. खेळाला वेळेची मर्यादा असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निर्णय घेऊन उपलब्ध सोंगट्यांची उपयुक्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यामुळे बुद्धिबळातील बुलेट प्रकारच्या खेळात फक्त एका मिनिटाच्या वेळेत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना एक वेगळाच थरार प्राप्त होतो. प्रयत्न करून हि हा सामना मी ०.००.१ मिनिटे म्हणजेच एका सेकंदाच्या सहाव्या भागाच्या फरकाने गमावला.

 सामना संपल्यावर विचारचक्र सुरू झाले. अनेक प्रसंगात आपल्याजवळ खूप वेळ असूनदेखील योग्य  नियोजन करायला आपण फार वेळ लावतो तसेच जिथे लवकर निर्णय घेता येतील अश्या प्रसंगातही गरज नसताना आपण 

खूप विचार करत बसतो. वेळ मात्र सतत निसटून जात असतो...

प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखून त्याचे नियोजन आणि लवकर अचूक निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याला जिंकावत असते, आयुष्यातही. कौशल्य असूनदेखील वेळेचे महत्व न ओळखल्यास आणि निर्णय घेण्यास दिरंगाई करीत बसल्यास काही उपयोग होत नाही. जसे वर नमूद केलेल्या खेळात माझ्या प्रतिस्पर्ध्याने फक्त काही मिलिसेकंद कमी घेतलेत आणि तो जिंकू शकला. प्रत्येक क्षण महत्वाचा असून त्याचे महत्व मात्र आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही आणि हाच अजाणतेपणा वेळेचा सदुपयोग करण्याच्या कामातील सर्वात मोठा अडसर ठरतो. 

वेळेचे महत्व वेळीच ओळखावे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

Wednesday 28 July 2021

अनंतातून शुन्याकडे: भाग ३ : सृष्टीशी एकरूपता

 


पर्यावरण किंवा निसर्ग हा आपल्या पासून वेगळा आहे असे समजण्याची चूक आपण करतो आणि मानवाकडून होणार निसर्गाचा ऱ्हास कसा कमी करता येईल याविषयी कल्पना करू लागतो.
हे संबंध विश्व एकच निसर्ग असून अस्तित्वात असलेली प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्ट एकमेकांना प्रभावित करीत निसर्गाची लय टिकवून ठेवीत असते. मग सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधील गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने प्राप्त झालेली स्थिरता असो किंवा एखाद्या मधमाशीकडून अजाणतेपणे होणारे हजारो परागकणांचे रोपण ज्यातून आजवर लक्षावधी वृक्षांची जंगले उभी राहिलीत.

माणूस या सर्व नैसर्गिक व्यवस्थे मध्ये कोणत्यातरी कोपऱ्यातील एक घटक आहे. नैसर्गिक व्यवस्थेला चालवणाऱ्या साखळी मध्ये आपण सर्वोच्च स्थानी नसून, फक्त चैतन्य प्राप्तीच्या बाबतीत सुदैवी ठरलो. इतर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी तुलना करता मानवाला होणार चेतनेचा बोध सर्वोच्च आहे. त्या अर्थी, मानवाने समस्थ सृष्टीच्या संचलनात मोलाचे योगदान देऊन प्रस्थापित निसर्ग व्यवस्था वृद्धिंगत करणे अपेक्षित आहे.
प्राप्त बुद्धीमुळे स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची घोडचूक आपण करीत आहोत आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या निसर्गाला आपल्यापासून वेगळे समजून केवळ आणि केवळ आपल्या षड्रिपूंवर आधारित गरजा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी निसर्गरूपी वृक्षाच्या मुळावर घाव घालीत असून ह्याच वटवृक्षावर आपले देखील घरटे आहे हे आपण पुरते विसरत चाललेलो आहोत.

पुराणकाळात उदयाला आलेल्या कोणत्याही संस्कृतीची बीजे निसर्गावर असलेले मानवाचे अवलंबित्व ओळखून निसर्गाचा आदर करण्यात सापडतात. मात्र गेल्या काही शतकांमध्ये अचानक उदयाला आलेली आधुनिक संस्कृती निसर्गापासून तुटत चालली असून केवळ अज्ञानामुळे आपण निसर्गाच्या शक्तीला दुर्लक्षित करत आहोत. अद्ययावत उपकरणे म्हणजेच मानवजातीचा आधार असे काहीसे मत तरुणांमध्ये तयार होताना दिसून येते. मात्र मानवासारखे उत्कृष्ट उपकरण बनवणाऱ्या निसर्गाच्या किमयेला दुर्लक्षित करून कसे चालेल.
अगदी अणुच्या घडणी पासून ते मानवीय चेतनेचा विकास करण्यापर्यंत निसर्गाने सूक्ष्म गोष्टींमध्ये देखील गफलत केलेली नाहीये. जैविकअभियांत्रिकीचा महासंचालक निसर्ग आपण रोजच्या व्यवहारात ध्यानात सुद्धा घेत नाही हे नवलंच. शे दोनशे वर्षांपूर्वी पर्यंत मात्र भारतीय आणि इतर काही संस्कृतीतील लोक निसर्ग शक्तींच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत दिवसाची सुरुवात आणि शेवट करत असत. आणि आज हा आदरभाव व्यक्त करणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण असे समजणारा अतिहुशार समाज अस्तित्वात येताना दिसतोय.
विश्वोत्पत्ती आणि उत्क्रांतीच्या महायज्ञातून निघालेला एक सूक्ष्म घटक म्हणजे मानव. मानवाचे अस्तित्व टिकून राहण्या करीत साहाय्य करणारे अब्जावधी इतर सजीव आणि निर्जीव घटक आपल्या नकळत मात्र अविरतपणे कार्य करीत आहेत, आणि जो पर्यंत त्यांच्या कार्यात काही अडथळा येत नाही तो पर्यंत याची जाणीवदेखील आपल्याला होत नसते.
मागील सत्रात पहिल्या प्रमाणे आपल्याला मोफत मिळणारा प्राणवायू लक्षावधी वर्षांपूर्वी एकदिवसाचे आयुष्य जगून सायनो बॅक्टरीया ह्या एकपेशीय जिवाने वातावरणात आणून आपल्याला देणगी दिली. पृथ्वीच्या शिलावरणातील खनिजे आणि मूलद्रव्ये खेचून घेऊन तुम्हाला प्राप्त असलेले सुदृढ आणि सुडौल शरीर बनवण्याकरिता हजारो वनस्पती आपले जीवन व्यतीत करीत आहेत. आपण ज्या दिशेला पाहू त्यादिशेला आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत तत्वे आणि घटना सापडतील, ज्यांचा रचयिता सर्वशक्तिमान निसर्ग शिवाय दुसरा कुणी नाही.
प्रदूषण कमी करावे, झाडे लावा, पाणी वाचवा यानं सारख्या घोषणा देऊन काही निद्रितावस्थेतील लोकांना जागृत करण्याची मुळात गरजच का भासावी अज्ञानाने शिखर का गाठावे?
सर्वोच्च बुद्धिमत्ता लाभलेल्या मानवाला स्वतः ची मूलभूत गरज कोणती याची स्वतंत्र्य जाणीव का करून द्यावी लागावी? याचे उत्तर एकाच, आधुनिकीकरणाच्या नावाखाली तयार झालेली ज्ञानी असल्याचा आभास घडवणारी अज्ञानी वृत्तीची होत असलेली जोपासना. ज्या वृत्तीचे मूळ कारण भोगीवादाचा काही अंशी केलेला स्वीकार होय. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास भोगीवाद म्हणजे पंचेंद्रियांच्या तृप्तीची सतत वाढ करीत राहणे होय.
येथे आधुनिकीकरणाला किंवा तांत्रिक प्रगतीला विरोध नाहीये, मात्र जीवन अधिकाधिक आरामदायी करण्याच्या मानसिकतेला बदलणे आवश्यक वाटते, जीवन अधिकाधिक सुव्यवस्थित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत असणे मानवासाठी सुखकर आणि काही वेळेस गरजेचे सुद्धा आहे यात कोणतीही शंका नाही. मात्र हे सर्व निसर्गाचा ऱ्हास करून प्राप्त करावे हे मात्र स्वतः च्या विरोधात एक दीर्घ कारस्थान करण्यासारखेच म्हणावे लागेल. ज्याचे परिणाम कालांतराने दिसू लागतील किंबहुना जगातील मुख्य शहरांतील खालावलेली भूजल पातळी आणि महासागराची वाढणारी पाण्याची पातळी याचे प्रमाण देऊ लागली आहे. आपण कोठे जात आहोत याची जाणीव आपल्याला झालेली आहे आणि आंतरराष्टीय स्थरावर हा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रयत्न झालेले हि दिसून येतात. मात्र सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था वेळेत यशस्वी होणे अवघडच. अर्थव्यवस्थेने प्रभावित किंवा ग्रसित आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवणे इतके सोपे नसून, या संस्थांचा वातावरणातील कार्बन नियंत्रित करण्याचा प्रयत्न निव्वळ गोगलगाय असून त्यामुळे वातावरणीय बदलाच्या वादळी वेगाला थोपवणे महाकठीण. या कामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानि केलेले प्रयत्न अपुरेच राहतील, कायम, जो पर्यंत तुमचा सक्रिय सहभाग यात नाही. सक्रिय सहभाग न होण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाशी आपले तुटत चाललेले नाते. सर्वप्रथम निसर्गाशी पुन्हा नाते जोडणे आवश्यक आहे. किमान १० पैकी ८ जणांना खरीखुरी जाणीव व्हावी लागेल कि शुद्ध हवा हि वायफाय पेक्षा जास्त महत्वाची आहे तसेच आपले आरोग्य, आर्थिक प्रगती, सामाजिक शांतता ह्या सर्व गोष्टी निसर्गाशी घट्ट जोडलेल्या आहेत याचे भान यावे लागेल. घरात गरज नसताना विद्युत उपकरणे बंद केल्याने जागतिक हवामान बदलला कमी करण्यासाठी आपलाही सूक्ष्म हातभार लागणार आहे याची जाणीव व्हावी लागेल.
एखादे झाड लावून त्याची जोपासना केल्यास आपल्या मुलांसाठी लक्षावधी टन प्राणवायू देणारे नैसर्गिक यंत्रच आपण उभारत आहोत अशी कर्तव्य पूर्तीची भावना मनात यावी लागेल. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या कारच्या इजिनची दुरुस्ती केल्याने, किंवा कमीत कमी इंधनाचा वापर केल्याने, किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास अथवा विद्युत वाहनाला प्राधान्य दिल्यास आपण पृथ्वीच्या वातावरणात फार मोठा सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारी उचलली आहे हे नक्की. दैनंदिन जीवनात शेकडो गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने करून देखील आपण निसर्गाला अबाधित ठेवून स्वतः साठी आणि आपल्या मुलांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि जगण्यायोग्या पृथ्वी बहाल करू शकतो. आपली पिढी ला मिळालेली संधी कदाचीत पुढील पिढ्यांना मिळणार नाही. हवामान बदलाचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आणखीन काही वर्षानंतर तो रोखणे किंवा कमी करणे मानवाच्या हाताबाहेरील असेल यात शंका नाही. भरधाव वेगाने जाणारे वाहन वेळीच रोखणे सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे मात्र नियंत्रण सुटल्यावर कितीही इच्छा असून उपयोग नाही.
इच्छा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे अजून तुमचे दैनंदिन कार्य वातावरणीय बदलामुळे म्हणावे तितके बाधित झालेले नाही म्हणून ही समस्या भविष्यातील समस्या असून माझे काही यात नुकसान नाही अशी विचित्र आणि स्वार्थी मानसिकता सर्वात बुध्दिमान मानवप्राणी जोपासत चाललाय. काही मायक्रो ग्राम चा मेदू लाभलेली एक लहानशी मुंगी देखील भविष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी वर्षभर आधी पासूनच प्रयत्न करते आणि  पर्जन्य काळात स्वतःला आणि आपल्या समाजाला सुखरूप ठेवते. निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या मानवाने भविष्यातील समस्यांना वेळीच थोपविण्यासाठी काय करावे हे वेगळे सांगण्याची खरच गरज आहे काय?

Tuesday 27 July 2021

The life can only be experienced in the present moment that is going on. Quote #TM387

सुविचार ३८७

*जीवनाचा आस्वाद फक्त चालु असलेल्या एकमेव वर्तमान क्षणातच अनुभवता येतो*.

आत्ताचा क्षण हाच खऱ्या अर्थाने जीवनाची प्रचिती देणारा असतो. बाकी सर्व मानसिक कल्पना आहेत. आत्ताचा क्षण आपण कसा व्यतीत करीत आहोत यावर आपला जीवनाचा अनुभव अवलंबून आहे. मात्र बऱ्याचदा वर्तमान क्षणाला सोडून आपले मन इतरत्र भरकटत राहते आणि जीवनाच्या मूलभूत अनुभवाशी जोडलेल्या दुव्याला स्पर्श करायचा राहूनच जातो.

Quote #TM387

 *The life can only be experienced in the present moment that is going on*.

 The present moment is when life is happening in the true sense. The rest of everything is imaginary.  Our life experience depends on how we try to live in the present moment. Most of the time, our mind wanders away from the present moment and it misses touching the link connected with the fundamental experience of life.

Saturday 10 July 2021

There is no other way to excel without absolute involvement. Quote #TM386

Quote #TM386

*There is no other way to excel without absolute involvement*.

We always want to learn many things but sometimes we find learning difficult becausse of low intensity and interest.
Gaining mastery over anything requires absolute attention that derives from involvement.

सुविचार ३८६

*कार्यात पूर्णपणे वाहून घेतल्या शिवाय उत्कृष्ट कार्य होऊ शकत नाही*

 अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आहेत पण कधीकधी आपल्याला ईच्छा असून देखील शिकणे कठीण वाटते. याचा अर्थ शिकण्याचे तीव्रता आणि रुची चा अभाव. खेळामध्ये पूर्णपणे रुची नसल्यास, त्यात सामील होणे आणि आपले उत्कृष्ट योगदान देणे कठीण आहे.

जिवंत तुरुंग.



वरील चित्र लहानां पासून मोठ्यानं पर्यंत कुणालाही दाखवून यांतील सद्गृहस्थ किंवा Gentlemen  कोण असे विचारल्यास? नक्कीच अधिकाधिक लोक, डावीकडील चित्रावर बोट ठेवतील.
यांतील डावीकडील व्यक्ती युरोप मधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून उजवीकडील व्यक्ती म्हणजे २०२१ साली  पद्मश्री पुरस्कार विजेती.

असे का? याचे उत्तर अगदी एका ओळीत देऊन तुम्हाला पटण्यासारखे नसेल कारण वरील चित्रातील उदाहरणाप्रमाणेच आपली बुद्धी हॅक झालेली आहे.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात बव्हंशी लोक सांगतील जगाच्या पाठीवर जर राहण्या योग्य राष्ट्र कोणते असेल तर ते पाश्चिमात्य स्थित. मग भारत राहण्यासाठी योग्य राष्ट्र का नाही?

आज जगात भारताची जी छाप आहे तीच आपल्या मनावरही बिंबित आहे.

भारत म्हंटले कि भ्रष्टचारी, महिलांसाठी असुरक्षित, घाणीचे वास, अवैज्ञानिक श्रद्धा, गरिबी अशी अनेक चित्रे मनासमोर तरळू लागतात. सोन्याचा धूर निघणाऱ्या राष्ट्राची प्रतिमा आज अगदी तळागाळात पाहायला मिळते.

१. गौरवशाली इतिहास

जगात क्वचितच एखादे राष्ट्र असावे ज्याला हजारो वर्षांचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास लाभलेला असावा, आज जे देश विकसित आहेत त्यांनादेखील इतका प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभलेला नाही. मात्र जो काही इतिहास त्यांना लाभला आहे त्यातील अभिमान करण्यासारख्या गोष्टी त्यांनी वारंवार जगजाहीर केल्यात, आणि नागरिकांनमध्ये  अस्मितेची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला.

भारताचा मात्र फक्त लुटमारीचा इतिहास सर्वज्ञात आणि सर्वजाहीर आहे, जणू गेल्या ७०० वर्षांव्यतिरिक्त भारतात काही घडलेच नसावे असे वाटू लागते, पुन्हा पुन्हा ठेचा लागूनयेत म्हणून हा इतिहास माहित असणे हि महत्वाचे  आहे. मात्र हा इतिहास म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचा फक्त पृष्ठभाग आहे, खोलवर पाहिल्यास भारताचा ऐतिहासिक ठेवा हा जगासाठी खजिनाच आहे.

आम्ही मात्र संस्कृतीच्या खोलीकडे पाठफिरवायची असे ठरवलेले दिसते. मुख्यत्वे गेल्या दोनशे वर्षातच डुबक्या मारायच्या, मनमुराद. शालेय जीवनात आपण ज्या गोष्टी शिकतो तीच आपली मुख्य विचारधारा बनते. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये काही मोजके गौरवशाली क्षण काही ओळींमध्ये पूर्ण केले जातात आणि लूटमार मात्र रंगीत चित्रांसहित मनावर बिंबवली जाते. जर लहान वयातच भारताचा इतिहासाचा खजिना नाही समजला तर तरुणांकडून भारतासाठी अभिमान बाळगण्याची वार्ता करू नये. कोणताही तरुण भारता बाहेर राहणेच पसंत करेल. राष्ट्रभक्तीची सुरुवात इतिहासातून होते, छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊंनी जर ऐतिहासिक गौरव ऐकवला नसता तर कदाचित आपला इतिहास वेगळा असता. विवेकानंद भारतीय तत्त्वज्ञानाच्या गर्त्यात मनसोक्त पोहले नसते तर खऱ्या अध्यात्माची ओळख जगापासून दूरच राहिली असती,डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण भारताच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणी गेले नसते तर भारताने गौरव करावा असे राष्ट्रपती कसे लाभले असते? बालपणीच राष्ट्राच्या उभारणीची ठिणगी पडल्यास भविष्य उज्वलच आहेत यात शंका नाही, याची प्रथम पायरी म्हणजेच गौरवशाली इतिहास शिकवण्यावर भर असावा. आज टाय घालून मिरवणाऱ्यांना जेव्हा अंगावर कपडे घालणे हि माहित नव्हते, त्या काळी भारतीय इतिहासात अवकाशाचा वेध घेणारे ग्रंथ श्लोकबद्ध केले जात होते. भारतीयांशी व्यापार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कित्येक पिढ्या पश्चिमेत जन्मल्या, आणि त्यांना भारत म्हणजे एक कल्पना विश्वातील राष्ट्र का वाटायचा, हे शिकवा. भारतातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची फक्त लूटमार करून हि अनेक शहरे इतिहासाच्या नकाश्यावर अस्तित्वात आलीत, यावरून समृद्धीची झलकभर पाहायला मिळते. पृथीच्या परिवलनाविषयी सांगणाऱ्या आधुनिक विद्वानांच्याही जवळपास १००० वर्षे आधी इथल्याच मातीत आर्यभटाने त्याच गोष्टी सूत्रबद्ध केलेल्या आहेत. शांततेचा संदेश देणारे आणि मानवीय जाणिवांच्या पलीकडील अभ्यास करणारे महान इथेच जन्मले, पूर्वोत्तर भारतातील इंग्रजांना देखील न जिंकता आलेल्या आहोमांचा अजिंक्य इतिहास शालेय पुस्तकातून निसटून गेला आहे त्याला पुन्हा रचना बद्ध केला जावा. जर तुम्ही गौरवशाली इतिहास सांगितला नाही तर तरुण पिढी हि गौरवशाली भविष्यासाठी झटणार नाही हे ध्यानी राहूदे. त्यांच्या साठी पाश्चिमात्य संस्कारच आदर्श असतील.


२. जगाचे अर्थकारण:

यशस्वी जीवन असे म्हणताच सर्वप्रथम डोळ्यांसमोर एक मोठे घर, आलिशान गाडी, पुष्कळ पैसे हे सहज तरळून जाते. यशाची हि व्याख्या आपल्या डोक्यात कुणी आणली? तरुणांमध्ये देशप्रेमाची ठिणगी पाडणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यशस्वी नव्हते काय? अब्दुल कलाम यांचे यश म्हणजे नेमके काय? हजारोंच्या जीवनाला स्पर्श करणारून जीवनाच्या आत्मिक प्रगतीचा मार्ग सांगणारे बुद्ध आणि वर्धमान महावीर,गुरु गोविंद सिंग यांचे यश कोणत्या प्रकारचे होते? आज सीमेवर उभा असलेल्या सैनिकाचे यश आपल्या यशाच्या व्याख्येत मात्र बसत नाही.

तरीही हे सर्व कमालीचे यशस्वी आहेत. मग आपल्या मनात हा आर्थिक यशाचा डोंगर उभा राहण्यामागे एकमेव कारण म्हणजेच रीतसर चाललेली दिशाभूल. पहिले कारण म्हणजे अटीतटीच्या आर्थिक स्पर्धेत आपल्या उत्पादनांसाठी प्रथम गरज निर्माण केली जाते आणि उत्पादन खपवले जाते, हि गरज निर्मिती म्हणजेच पाथमिक दिशाभूल, ठराविक रंगच उत्कृष्ट, ठराविक शारिरीक बांधणीच उत्कृष्ट, ठराविक पेय पिणे म्हणजेच मर्दानी खेळ, काही उत्पादने जर लहान मुलांना दिली नाहीत तर बुद्धीचा विकास होणारच नाही, ऐषारामी जीवन जगणे म्हणजेच मौज. अश्या अनेक प्रतिमा लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल्या जातात आणि आर्थिक गरज निर्माण होते. 

याचा अर्थ पैसे महत्वाचे नाहीत असा नाही, पैश्यांची उपयोगिता सर्वात अधिक. मात्र तो तुमच्या आयुष्या हेतू नसावा. गाडीमध्ये पेट्रोल ज्या प्रमाणे गरजेचे आहे त्याप्रमाणे पैसे महत्वाचे आहेत. मात्र आपण पेट्रोलसाठी आपण गाडी चालवत नाही. तसेच तुमचे आयुष्याचे विविध पैलू विकसित करून स्वतः चे आणि जगाचे कल्याण करण्या साठी ह्या पैश्याचा वापर होणे सर्वात हितकारक. युद्ध साहित्य निर्मिती, औषधी उत्पादने आणि सौंदर्य प्रसाधने हे जगावर अधिराज्य गाजवणारे उद्योग जो पर्यंत अस्तित्वात आहेत तो पर्यंत ह्या सर्वांची गरज हि जगात निर्माण होतच राहणार, केली जाणार. असो- यापूर्वी भारतीयांना आत्मिक स्वातंत्र्य हेच परम यश असावे असे वाटत होते, कारण त्याचे जागतिक महत्व समजावून सांगणारा इतिहास अभ्यासात होता. वसुधैव कुटुंबकं हे तेव्हापासून उगीच कुणीतरी लिहून ठेवलेलं नाहीये. आज आपल्या मानसिकतेला भोगीवादाने इतके भ्रमित केलेलं आहे कि चंगळवाद हाच आनंदाचा मार्ग अशी दिशाभूल झालेली आहे आणि वृत्तीही जड झाल्याने बदलाभिमुख तरुणाई ची संख्या शून्य होत चाललीये. यावर उपाय म्हणजेच भारतीय ज्ञानाचा खजिना जोपासून भारताला आर्थिक महासत्ता बनवणे यासाठी आधी उद्योगी व्यक्तिमत्वाची उद्यमात सकल समृद्धी या भारतीय सुभाषितशी ओळख करून द्यावी आणि मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्पादनाच्या स्पर्धेत उतरावे. कागदांव्यतिरिक्त प्रत्यक्ष कृतीत लक्ष्य दिल्यास पुढील काळात लाखो उद्योगी घडवता येऊ शकतील.

कारण जे राष्ट्र आर्थिक रित्या बलवान जग त्यांचेच ऐकेल. आणि आत्मिक मूल्यांशिवाय शिवाय महासत्ता बनू पाहणारी राष्ट्रे जगासाठी धोकाच निर्माण करतील, कारण त्यांची भाषा सर्वसमावेशक कधीच होऊ शकत नाही, फक्त आणि फक्त कुरघोडीची वृत्तीच पाहायला मिळेल.

तरुणांना भारतात राहून आर्थिक समृद्धी साधण्याची भाषा न शिकवल्यास इतिहासाच्या अपुऱ्या ज्ञानामुळे प्रत्येकाला पश्चिमेकडील वातावरणाचा लळा लागण्याची शक्यता जास्तच राहील.


३. भ्रष्टचाराचा राक्षस

कोठून आला हा राक्षस जवळपास सर्वच व्यवस्था गिळंकृत केलेला हा महाकाय भस्मासुर टेबलाच्या पलीकडेच आहे असे समजून फक्त दोषारोप करू नयेत. यासाठी सर्वस्वी जबाबदार आपणच. मतदानापासून तो सुरु होतो. इतिहासातील मूल्य शिक्षणाचा अभाव, आर्थिक गरज जास्त त्यामुळे हांजी हांजी करून बलशाली व्यक्तीला निवडून दिल्यावर तो कान पिळणारच. याउलट फक्त आणि फक्त तुमच्या लहानश्या गावात किंवा नगरात जो व्यक्ती निस्वार्थपणे झटत  असतो त्यालाच निवडून द्यावे. आणि निवडून दिल्यावर जाब विचारायची हि सवय लावून घ्यावी. सत्तेची गणिते सहज सोपी बनतील. आधी आपल्यातला भस्मासुर काढून टाकावा म्हणजे व्यवस्थेतूनही तो निघून जाईल. व्यवस्था म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आपल्यासारखीच षडरीपूंनि ग्रस्त माणसं, भरकटलेली. भ्रष्टाचाराचा हा सुरुंग उडवून लावल्याशिवाय, भारताला उद्योगी राष्ट्र बनवणे अवघड, फक्त मूल्य शिकवून जग घडणार नाही, आर्थिक महासत्ता हि बनावे लागेल म्हणजे जगात मूल्यांचे संवर्धन करता येईल.

अश्या अनेक बाबींमध्ये लक्ष्य घालून पहिल्यांदा भारतीयांमध्ये भारताबद्दल अभिमान जागृत केला जावा, अन्यथा भावी पिढीची सद्गृहस्थाची, मूल्यांची, जीवनाची आणि भारताची व्याख्या बदलत राहील आणि भारताला एक जिवंत तुरुंग मानून, यातून सुटून जाण्यातच धन्यता मानणाऱ्या अनेक पिढ्या तयार होतील, अन त्यात वावगे काहीच नसेल.

Friday 9 July 2021

Every morning or night, allow your ego to let go of everything it holds. Quote #TM385

Quote #TM385

*Every morning or night, allow your ego to let go of everything it holds*

Every day, a few things don't happen our way and negativity takes charge of our minds.  Our ego holds such negativity like a magnet and keeps it for a long time.  Sometimes mind goes ahead and digs in the past to discovers more threads of similar negative patterns and begins to weave a web like a spider around those negative emotions, mind engrosses itself in this trap and becomes one with the ego, now the ego does not exist separate from us. We ignore the fact that all this psychological drama is produced by us, here the chain of mental catastrophes begins.
If you want to avoid this in time, at least once a day, relax all the threads connected with ego and remember your subtle existence on a cosmic scale.

सुविचार ३८५

*प्रत्येक सकाळी अथवा रात्री, आपल्या अहंकाराला त्याने धरलेली प्रत्येक गोष्ट सोडून देण्याची अनुमती द्यावी*

दिवसभरात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. त्या गोष्टींच्या बाबतीत मनात नकारात्मकता साठू लागते. आपला अहंकार अश्या गोष्टीना चुंबका सारखा पकडतो आणि पुढे खूप काळ धरून ही ठेवतो. कधी कधी तो भूतकाळातले नकारात्मकतेचे आणखीन धागे शोधून काढतो आणि त्या नकारात्मक भावने भोवती कोळ्या सारखे जाळे विणायला लागतो. बघता बघता आपण त्यात इतके गुरफटत जातो की अहंकारचे आपल्यापेक्षा वेगळे अस्तित्वच राहत नाही. अन् हा सगळा एक मानसिक खेळ आहे हेच आपण विसरतो. आणि मानसिक समस्यांची साखळीच सुरू होते. वेळीच हे टाळायचे असल्यास रोज एकदातरी अहांकरा शी जोडलेले सर्व धागे शिथिल करावे आणि वैश्विक पातळीवरील आपल्या सूक्ष्म अस्तित्वाचे स्मरण करावे.

Thursday 8 July 2021

Cultivating calmness and focus in daily life will make a huge difference in life. Quote #TM384

 Quote #TM384


Cultivating calmness and focus in daily life will make a huge difference in life.

Mostly human tendencies are reactive and expressive, and that’s fine. But when  focus and calmness are not accompanied by these two, they create blunders. Your mind is capable enough to prove that what you are thinking is true and it compels you to react without wasting any time. The important thing is to pause for a moment and rethink the topics. The few moments spent to stop and think before the reaction can change the course of life.


सुविचार ३८४

दैनंदिन जीवनात लक्ष केंद्रित केल्यास आणि शांत वृत्ती जोपासल्यास आयुष्यात मोठा फरक पडेल.

मुख्यतः मानवी प्रवृत्ती प्रतिक्रियात्मक आणि व्यक्त होण्यास अधीर असतात आणि ते ठीक आहे. परंतु जेव्हा या दोन्हीं सोबत एकाग्रता आणि शांतवृत्ती नसते तेव्हा ते दोष निर्माण करतात. आपलेच म्हणणे सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी आपले मन पुरेसे सक्षम आहे आणि थोडा हि वेळ न घालवता तशी प्रतिक्रिया देण्यास हेच मन भाग पाडते. एक निमिषभर थांबून विषयांवर पुनर्विचार करणे ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. प्रतिक्रिये आधी थांबून विचार करण्यासाठी वापरलेले काही क्षण जीवनाचा मार्ग बदलू शकतात.

Wednesday 7 July 2021

Know instead of believing. Quote #TM383

Quote TM#383

Know instead of believing.

The world is full of believers and a lot of time their unexamined beliefs stand as an obstacle in the way of making the world conscious. Many people believe something that is concluded by someone else, it would be appropriate to use such a conclusion as a reference point, but believing in it without questioning or experiencing the concluded facts should not be endorsed. Once you become a knower of the known, the knowledge may be incorporated to form a matrix of mind's clarity, but it is dangerous to believe and learn without thinking. This is a hidden but future threat for generations.


सुविचार ३८३

विश्वास ठेवण्याऐवजी जाणून घ्या.

जग विश्वास ठेवणाऱ्यानी भरलेले आहे आणि असे लोक जागरूकता प्राप्त करण्याच्या मार्गावरील सर्वात मोठे अडथळे बनत आहेत. खूप लोक अश्या गोष्टींवर विश्वास ठेवतात जे इतर कुणाचे तरी निष्कर्ष असतात मात्र अद्याप  त्यांनी स्वत: अनुभवलेले नसतात.  हे निष्कर्ष संदर्भ म्हणून वापरणे योग्य ठरेल, परंतु अंतिम निष्कर्ष म्हणून विश्वास ठेवने योग्य नाही. आपणच स्वतः  जागरुकतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नंतर, ते ज्ञान अंतर्भूत केले जाऊ शकते, परंतु विचार न करता विश्वास ठेवणे आणि जाणून घेणे धोकादायक आहे. दीर्घ काळासाठी हा एक छुपा स्वरूपाचा धोका आहे.

Tuesday 6 July 2021

If you could listen to the intent, you can offer better resolution. Quote #TM382

Quote #TM382

*If you could listen to the intent, you can offer better resolution*

Words carry fewer expressions therefore relying on words can limit our perception.
The intent is something that hardly gets expressed through words.
Understanding the intent is an invisible job done by our consciousness.
The higher the degree of consciousness, the higher the chances of comprehending true intent.

सुविचार #३८२

 *आपण हेतू ऐकता आल्यास असल्यास त्यास अधिक चांगला प्रस्ताव देऊ शकता*

शब्दांतून होणारी अभिव्यक्ती फारच कमी असते म्हणून फक्त शब्दांवर अवलंबून राहून आपली समज मर्यादित होऊ शकते.
 हेतू अशी एक गोष्ट आहे जी शब्दांद्वारे महत्प्रयासाने व्यक्त होते. हेतू समजून घेणे हे आपल्या चेतनेद्वारे केलेले एक अदृश्य काम आहे.
 चेतनाची डिग्री जितकी जास्त असेल तितकी वास्तविक हेतू समजून घेण्याची शक्यता जास्त आहे.

Monday 5 July 2021

An inclusive perspective can solve many problems. Quote #TM381

Quote #TM381

*An inclusive perspective can solve many problems.*

Perspective is the culmination of the physical and mental episodes one has witnessed.
Therefore, rather than judging anyone's perspective under a category of right or wrong, one should test whether the perspective is applicable under the available circumstances or not. Also If your perspective is not comprehensive in any circumstance, you need to re-evaluate it.

सुविचार ३८१

 *सर्वसमावेशक दृष्टीकोन अनेक समस्यांचे निवारण करू शकतो.*

प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन त्याच्यासोबत घडणाऱ्या भौतिक आणि मानसिक क्रियांचा परिपाक असतो.
म्हणून कोणताही दृष्टीकोन बरोबर अथवा चूक असा गृहीत धरण्यापेक्षा, उपलब्ध परिस्थितीत लागू पडणारा आहे कि नाही याची चाचणी करावी. जर आपला दृष्टीकोन सर्वसमावेशक नसेल तर पुन्हा पडताळणी करणे गरजेचे आहे.

Sunday 4 July 2021

Our tendencies shape our future. Quote #TM 380

Quote #TM 380
*Our tendencies shape our future.*

Tendencies are formed and hold the mind very tight. And determine the course of life. Since the tendencies are very rigid, it is not easy to change them. But what we spend most of our time on depends on what kind of tendency we are going to be enslaved to.
So choose your internal and external environment carefully.

सुविचार ३८०

*आपल्या प्रवृत्तीच आपले भविष्य घडवत असतात.*

प्रवृत्ती निर्माण होतात आणि मनाला खूप घट्ट पकडून राहतात. आणि आयुष्याचा मार्ग निर्धारित करतात. प्रवृत्ती अतिशय चिवट असल्याने त्या बदलवणे सोपे नसते. मात्र कोणत्या गोष्टींवर आपण जास्त वेळ घालवतोय यावर अवलंबून आहे कोणत्या प्रकारच्या प्रवृत्तीचे आपण गुलाम बनणार आहोत.
म्हणूनच आपले अंतर्गत आणि बाह्य वातावरण काळजीपूर्वक निवडावे.

Tuesday 8 June 2021

Sometimes you need to act without much waiting for the right moment, and it will unleash your hidden potential. Quote #TM379

Quote #TM379

*Sometimes you need to act without much waiting for the right moment, and it will unleash your hidden potential*

Often our inherent energy automatically finds the right direction, and our hidden potential suddenly comes to the fore. Most of the time we see our potential through a limited psychological frame but sudden spontaneous participation in such activity breaks our limited psychological frame and introduced us to a new self.

सुविचार३७९

*कधीकधी आपल्याला योग्य क्षणाची वाट न पाहता कृती करण्याची आवश्यकता असते आणि यामुळे आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव होईल*

अनेकदा आपली अंतर्भूत उर्जा आपोआपच योग्य दिशा शोधते. आणि आपली लपलेली क्षमता अचानक समोर येते. कारण एका मानसिक साच्यात आपण आपली क्षमतेची कल्पना करत असतो आणि अचानक उत्स्फूर्तपणे कार्यात सहभागी होण्यामुळे आपला मर्यादित साचेबंद तुटून जातो आणि तुम्हाला तुमची नव्याने ओळख होते.

Wednesday 26 May 2021

Recognize the complex dependencies of life. Quote #TM378

Quote #TM378

Recognize the complex dependencies of life.

The more complex the process of life, the more complex the relation of life to nature. We are a part of the ecosystem of nature and the coincidentally acquired intelligence due to which the gift of ego arises and our existence seems to be supreme is not to be believed. The existence of the 'dust of life' is deeply rooted in every dust particle of nature.

सुविचार ३७८

जीवनाची जटिल अवलंबित्व ओळखून घ्या

जीवनाची प्रक्रिया जितकी जटिल तितकाच जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध जटिल. आणि निसर्गाच्या परिसंस्थेतील आपण एक भाग असून योगायोगाने लाभलेल्या बुद्धिमत्ते ज्या वरदानामुळे अहंकार उद्भवून आपले अस्तित्व सर्वोच असल्याचा भास म्हणजे सत्यमानू नये. जीवनाच्या धूलिकणांचे अस्तित्व निसर्गाच्या प्रत्येक धूलिकणांत खोलवर रुजलेलं आहे.

Tuesday 25 May 2021

Ability to argue without heating the mind is a sign of wisdom. Quote #TM377

Quote #TM377

*Ability to argue without heating the mind is a sign of wisdom.*

Disengaging yourself from the intense emotional flow and trying to get things done by just maintaining the focus on the right things without falling prey to unwanted distractions is itself a guarantee of success.

सुविचार ३७७

*डोकं गरम केल्याशिवाय वाद घालू शकणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.*

तीव्र भावनेच्या आहारी जाण्यापासून स्वतः ला वाचवणे आणि योग्य त्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करून कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच कार्य सिद्धीस जाण्याची हमी.

Sunday 23 May 2021

The meaning of everything changes according to the interpreter. Quote #TM376

Quote #TM376

*The meaning of everything changes according to the interpreter.*

Memory is the biggest part of the interpretation process, so the interpretation will be based on the information that everyone has experienced and assimilated. That is why interpretation gives birth to meaning in the true sense.

 सुविचार ३७६

*प्रत्येक गोष्टीचा अर्थ, अर्थ लावणाऱ्या नुसार बदलत असतो.*

अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत स्मरण शक्ती चा सर्वात मोठा भाग आहे, त्यामुळे लावण्यात येणार अर्थ प्रत्येकाने अनुभवलेल्या आणि आत्मसात केलेल्या माहितीच्या आधारेच लावला जाण्याची शक्यता सर्वात जास्त. म्हणूनच अर्थ लावणारच खऱ्या अर्थाने अर्थाला जन्म देत असतो.  

Saturday 22 May 2021

Listen to the life around you. Quote #TM375

Quote #TM375

Listen to the life around you

Man becomes so absorbed in himself that he completely forgets the area of which he is a part. And when he stumbles then becomes aware of his surroundings and begin to remember that our existence is part of this environment. But, an awareness of the nature's creation which is surrounding him should remain in the mind constantly.

सभोवतालचे जीवन ऐका

मनुष्य आपल्यातच इतका गढून जातो कि ज्या परिसराचा तो भाग आहे त्याचा पूर्ण पणे विसर त्याला पडतो. आणि कधीतरी ठेच लागून सभोवतालच्या परिसराची जाणीव त्याला होते. आणि आपले अस्तित्व ह्याच परिसराचा भाग आहे याची आठवण येऊ लागते. असे न होता सृष्टीविषयि जाण सतत मनात राहूदे.  

Thursday 20 May 2021

Physical and mental well-being depend on each other. Quote #TM374

Quote#TM374

*Physical and mental well-being depend on each other.*

Both body and mind affect each other so take care of both. More and more goals are focused on acquiring mental skills to move towards financial well-being. But at the same time, the whole body should not be missed. Because soundness is a combination of both.

सुविचार ३७४ 

*शारीरिक आणि मानसिक सुदृढता एकमेकांवर अवलंबून आहे.*

शरीर आणि मन दोन्ही एकमेकांवर प्रभाव टाकतात त्यामुळे दोघांचीही काळजी घ्या. आर्थिक सुबत्तेकडे जाण्यासाठी अधिकाधिक लक्ष्य मानसिक कौशल्य आत्मसात करण्याकडे केंद्रित केले जाते. मात्र त्याच बरोबर शरीराकडे संपूर्ण लक्ष्य असुद्या. कारण सुदृढता हि दोन्हींच्या मिलाफातूनच तयार होते. 

Wednesday 19 May 2021

Find expression for your inner strength. quote #TM373

quote #TM373

*Find expression for your inner strength.*

We are aware of our inner strength somewhere deep down. But in the race for survival, we hide this power deep within the boundaries of safety. But it is the true expression of our strength, and we must try to make it work.

सुविचार ३७३ 

*आपल्या आंतरिक  सामर्थ्यासाठी  अभिव्यक्ती शोधा.*

आपल्या आंतरिक सामर्थ्याची जाणीव आपल्याला कुठेतरी खोलवर असतेच. मात्र जगण्याच्या स्पर्धेत धोका नको म्हणून ह्या सामर्थ्याला आपण सुखरूपतेच्या सिमेत खोलवर दडवून ठेवतो. मात्र तीच आपल्या सामर्थ्याची खरी अभिव्यक्ती असून, तिला मार्ग करून देण्याचा प्रयत्न आपण कारायला  हवा. 

Tuesday 18 May 2021

There is nothing as possible or impossible, there can only be a difference of ability. Quote#TM372

Quote#TM372

*There is nothing as possible or impossible, there can only be a difference of ability.*

 All possibilities are very open to this world, like WiFi. If we develop the right capabilities then it will automatically download those possibilities and make them come true. Thus, only by developing our physical and mental devices properly can we increase our receptivity to the possibilities.

सुविचार ३७२

*कोणती हि  गोष्ट शक्य  किंवा  अशक्य  नसते, फक्त  क्षमतेचा फरक असू शकतो.*

सर्व शक्यता ह्या विश्व अगदी खुल्या आहेत, जसे वायफाय. आपण आपल्यात योग्य त्या क्षमतेचं विकास केला कि आपोआपच त्या शक्यता डाउनलोड होऊन प्रत्यक्षात येऊ लागतील, आपल्या शरीरीक आणि मानसिक उपकरणांना योग्यरित्या विकसित करूनच आपली शक्यतान प्रति ची ग्रहणशीलता वाढवू शकतो.

Truth can be even more bizarre and incomprehensible than you realize. Quote#TM371

Quote#TM371

*Truth can be even more bizarre and incomprehensible than you realize.*

It may be deceptive to assume that what is seen is true, because the world can create a picture for their advantage, and the general public may find that illusion to be true.  Going a little deeper will possibly increase the chances to reach the actual truth. Today's world is full of such false truths.

सुविचार ३७१

*आपल्याला जाणवते त्या पेक्षा सत्य अगदी विचित्र आणि अनाकलनीय असू शकते.*

समोर दिसते तेच सत्य असे मानणे कदाचित फसवे ठरू शकते, कारण जग त्यांच्या फायद्याचे च चित्र उभे करू शकते, आणि सामान्य लोकांना ते भासमान चित्र खरे वाटू शकते. थोडे खोलात जाऊन पाहता, हे च सत्य विचित्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजचे जग अश्याच भासमान सत्यानी ओथंबून वाहत आहे.

Saturday 15 May 2021

Do it if it matters. Quote#TM370

Quote#TM370

*Do it if it matters.*

If what you desire to do is going to generate even a little bit of positive energy in the world, or even going to make a smaller positive impact as a dewdrop, it should be done with priority.  Many such dewdrops will create an ocean of positive energy.

सुविचार ३७०

*जर काम महत्त्वाचे असेल तर ते कराच*

आपल्या विचाराधीन असलेल्या एखाद्या कार्यामुळे जर जगात थोडी जरी सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार असेल किंवा अगदी दवबिंदू इतकाही सकारात्मक प्रभाव पडणार असेल तर ते कार्य प्राधान्य देऊन केले पाहिजे. असे अनेक दवबिंदू मिळून महासागर निर्माण होईल, सकारात्मक उर्जेचा.

Friday 14 May 2021

If you know when to keep quiet, then your communication skills are good. Quote #TM369

Quote #TM369

If you know when to keep quiet, then your communication skills are good.

Not everything is expressed verbally, some things become clearer with silence. Especially those things which needs an inner awareness. It is probably better to respond calmly in a communication at where introspection is necessary.


सुविचार ३६९ 

जर शांत कधी राहावे याचे ज्ञान असेल तर आपले संभाषण कौशल्य चांगले आहे असे समजावे.

प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त होत असते असे नाही. काही गोष्टी शांतता राहिल्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात.खास करून जाणीव निर्माण करण्याच्या गोष्टी. जिथे आत्मचिंतनाचा संदर्भ आहे अश्या गोष्टींसाठी शांत राहून प्रत्युत्तर देणे कदाचित अधिक चांगले.

Thursday 13 May 2021

No state of mind is permanent, some last longer and some last a little more longer. Quote #TM368

Quote #TM368

*No state of mind is permanent, some last longer and some last a little more longer*

The state of mind greatly influences decision-making ability.  The mental state keeps changing like the wind. It takes inner strength to stand on the ship and hold on to the same path even in this ever-changing state.  Otherwise, this changing mentality seems to be so permanent that the ships of your decision are more likely to sway and miss the destination.

सुविचार ३६८

*मनाची कोणतीही स्थिती कायम नसते, काही फार काळ टिकून राहतात आणि काही त्याहून जास्त काळ*

निर्णय क्षमतेवर मनाची तात्कालीन स्थिती फार प्रभाव टाकते. वाहणाऱ्या वाऱ्या प्रमाणे मानसिक स्थीती ही बदलत असते. शिडाच्या जहाजावर उभे राहून ह्या सतत बदलणाऱ्या अवस्थेमध्ये सुध्दा एकच मार्ग धरून ठेवण्यासाठी आत्मिक बळच हवे. अन्यथा ही बदलती मानसिकता इतकी कायमस्वरूपी असल्याचा भास होतो की आपली निर्णयाची जहाजं हेलकावे खात भरकटण्याची शक्यताच जास्त.

Wednesday 12 May 2021

Expressing yourself in the right way at the right time is not just a skill but a way to make life easier. Quote #TM367

Quote #TM367

Expressing yourself in the right way at the right time is not just a skill but a way to make life easier.

Often latent emotions dominate many aspects of life, unknowingly. Expression is everyone's need, and drawing oneself in unexpressed thoughts and feelings in the name of maintaining formality and image framework is not the same as living life. Expressing and accepting openly is a sign of vitality.

सुविचार ३६७ 

योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यक्त होणे हे फक्त कौशल्य नसून जीवनाला सुखकर करण्याचा मार्गच आहे.

अनेकदा अव्यक्त भावना जीवनाच्या अनेक पैलूं मध्ये वर्चस्व गाजवत असतात, आणि तेही अगदी आपली नकळत.व्यक्त होणे हि प्रत्येकाची गरज असून, औपचारिकता आणि प्रतिमांची चौकट राखण्याच्या नावाखाली अव्यक्त विचार आणि भावनांचा साठा करून त्यात बुडणे ह्याला जीवन जगणे असे म्हणूच शकत नाही. व्यक्त होणे आणि खुले पणाने स्वीकार करणे हे जिवंतपणाचे लक्षण होय.


Monday 10 May 2021

Make your presence pleasant. Quote #TM366

Quote #TM366

*Make your presence pleasant*

What we store inside us, we will spread that everywhere.  So to make your presence pleasant, first of all work on making your inner environment pleasant.  So the people around you will also feel happy.

सुविचार ३६६

*आपली उपस्थिती आनंददायी बनवा.*

आपण आपल्या आतमध्ये जे साठवून ठेवतो तेच सगळीकडे पसरवत असतो. म्हणून आपली उपस्थिती आनंददायी व्हावी या करिता सर्वप्रथम आपले अंतर्गत वातावरण आनंददायी करण्यावर काम करावे. म्हणजे आपल्या भोवताली वावरणारी माणसांना सुध्दा आनंदीच वाटू लागेल. 

Sunday 9 May 2021

Your dedication builds determination, discipline, and commitment which make the difference. Quote #TM365

Quote #TM365

*Your dedication builds determination, discipline, and commitment which make the difference*

Dedication increases the chances of success in any endeavor.  This is because the flow of dedication becomes the source for building the qualities necessary for the success of the task such as discipline, determination, and commitment, then we automatically achieve the physical and mental state which is necessary for success. Therefore, one should first dedicate oneself to the work, without thinking too much about the innate qualities.  Dedication is an invisible energy that attracts other essential qualities and makes you fit for the responsibility.

सुविचार ३६५

*कार्या प्रती आपल्या समर्पणामुळे दृढनिश्चय, शिस्त आणि कटिबद्धता निर्माण होऊन परिवर्तन घडून येते.*

आपण समर्पित असलो की कोणत्याही कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. कारण समर्पण वृत्ती कार्य यशस्वी होण्या करिता आवश्यक गुणांचा जसे शिस्त, निश्चय आणि कटिबध्दता यांचा स्त्रोत बनते आणि आपोआपच शारीरिक मानसिक योग्यता गाठली जाते.
त्यामुळे प्रथम अंगीभूत गुणांचा फार ऊहापोह न करता, कार्या प्रती समर्पित व्हावे. समर्पण एक अदृश्य उर्जा असून इतर आवश्यक गुणांना ती आकर्षित करेल आणि तुम्हाला कार्यपूर्ती करिता योग्य बनवेल.

Saturday 8 May 2021

Sometimes you have to come forward and fight because no one else can do it. Quote#TM364

Quote#TM364

*Sometimes you have to come forward and fight because no one else can do it*

When the struggle to establish what is most 'needed' for people, becomes inevitable in this world, destiny is expecting you to stand up and try to do so. Maybe other people are confused or lack courage, but you are expected to take action in such circumstances by recognizing your Karma Yoga.


सुविचार ३६४

*कधीकधी तुम्हाला पुढे येवून युद्ध करावे लागेल, कारण इतर कोणीही तसे करू शकण्या योग्य नसेल*

जे सर्वांसाठी गरजेचे आहे त्याची स्थापना करण्यासाठी झगडणे ह्या जगात जेव्हा अटळ होऊन जाते तेव्हा तुम्ही उभे राहून तसा प्रयत्न करणे नियतीला अपेक्षित असते.
कदाचित इतर लोकांमध्ये संभ्रम असेल किंवा धाडसाचा अभाव असेल. मात्र तुमच्या कडून अश्या प्रसंगी कर्म योगाला ओळखून कार्य करणे अपेक्षित असते.

Friday 7 May 2021

Rather than waiting for the situation to be normal, empowering yourself is the most effective way to go through the tuff time. Quote #TM363

Quote #TM363

Rather than waiting for the situation to be normal, empowering yourself is the most effective way to go through the tuff time.

A soldier empowers himself and aspires to take part in intense battles without fear of war, and gives his best to shape the victory. Same way, everyone should be determined to face any problem or difficult situation and win by making themselves capable.  Only your conscious preparation can win you over.

सुविचार ३६३

परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतः ला सक्षम बनवणे सर्वात प्रभावी मार्ग होय.,

ज्याप्रमाणे सैनिक युद्ध प्रसंगाना न घाबरता स्वतः ला सक्षम बनवून अधिकाधिक घनघोर युद्धात भाग घेऊन विजयी होण्याची महत्त्वाकांक्षा ठेवतो त्याच प्रमाणे प्रत्येकाने कोणत्याही समस्येला किंवा खडतर प्रसंगाना सामोरे जावून जिंकण्याची जिद्द आत्मसात करायला हवी. अन् त्या करिता स्वतः ल सक्षम आणि सिद्ध बनवायला हवं. तुमची सजग तयारीच तुम्हाला जिंकवू शकते.

Thursday 6 May 2021

Be equipped with courage and clarity. Quote #TM362

Quote #TM362

*Be equipped with courage and clarity.*

Courage and clarity are an important combination for the development of the world. Basically, the source of bravery comes from clear awareness and thinking.  The world today is in dire need of people with both of these qualities, and you are one of them.

सुविचार ३६२

धैर्याने आणि स्पष्टतेने सुसज्ज व्हा. *

शौर्य आणि सुस्पष्टता जगाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मिलाफ आहे. मुळात शौर्याचा उगम सुस्पष्ट जाणीव आणि विचार यातूनच होतो. सध्या जगाला या दोन्ही गुणांनी युक्त लोकांची अत्यंत आवश्यकता. आहे. आणि तुम्ही त्यांतील एक आहात.

Wednesday 5 May 2021

New knowledge should be welcomed openly by putting egoism aside. Quote #TM361

Quote #TM361

New knowledge should be welcomed openly by putting egoism aside.

When more knowledge or new knowledge comes in our way, often our ego pretends that we have perfect knowledge already, hence it doesn't accept the new knowledge easily. Which impedes knowledge enrichment and may result in loss of opportunity for progress. Therefore, every opportunity to learn new things should be used to the fullest.


सुविचार ३६१
नवज्ञानाचे स्वागत खुले पणाने करावे, अहं भावनेला बाजूला सारून.
कोणत्याही विषयाचे अधिक ज्ञान किंवा नवीन ज्ञान आपल्यासमोर आले तर बऱ्याचदा आपल्यातला अहं भाव ते ज्ञान स्वीकृत न करता स्वतः कडे परिपूर्ण ज्ञान असल्याचा आव आणते. ज्यामुळे ज्ञान संवर्धन खुंटते आणि परणामी प्रगतीची संधी गमावली जाऊ शकते. म्हणूनच नवीन गोष्टीविषयी जाणून घेण्याच्या प्रत्येक संधीचा पूर्ण वापर केला जावा.

Finding the root of the problem is an important step in solving the problem. Quote #TM360

Quote #TM360

*Finding the root of the problem is an important step in solving the problem.*

Just as the root of a tree holds its big stem, similarly, the invisible root cause is always responsible for the negative consequences to which we call 'the problem'. The real cause of the problem can be the reason which cannot be divided further, and the emphasis should be on eradicating the problem by working on the root cause.

सुविचार ३६०

*समस्येचे अविभाज्य मूळ सापडणे हा समस्या सोडवण्यात महत्वपूर्ण टप्पा आहे.*

जसे वृक्षाचे मूळ त्याच्या भल्या मोठ्या घेऱ्याला धरून ठेवते तसेच , समस्येच्या परिणामांना त्याचे अदृश्य मूळ जबाबदार असते. ज्या कारणाला विभाजित करता येत नाही तेच समस्येचे खरे कारण समजावे आणि त्याचेवर काम करून समस्येचे समूळ उच्चाटन करण्यावर भर द्यावा.



Monday 3 May 2021

Laughter and communication is free medicine, take it from time to time. Quote #TM359

Quote #TM359

Laughter and communication is free medicine, take it from time to time.

Mental illnesses do not realize their existence as they are invisible, but the power to produce physical illnesses lies in mental instability. Laughing and interacting with each other can save you from thousands of physical ailments for free. 

सुविचार ३५९

हसणे आणि संवाद हि मोफत मिळालेली औषधी आहे, वेळोवेळी घेत चला.

मानसिक रोग अदृश्य असल्याने त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, मात्र शारीरिक रोग उत्पन्न करण्याची शक्ती मानसिक अस्थिरते मध्ये आहे. हसणे आणि एमेकांशी संवाद साधण्यामुळे जवळपास हजारो शारीरिक रोगांपासून दुसरं राहता येऊ शकते तेही अगदी मोफत.

The path to world peace begins with giving your mind a sense of peace. Quote #TM358

Quote #TM358


The path to world peace begins with giving your mind a sense of peace.

If you give yourself the experience of peace of mind, you can succeed in establishing peace to some extent by influencing the people around you, an unstable mind can never give a message of peace to others. That is why you have to establish yourself first and then take the next step.

 सुविचार ३५८ 

विश्व शांतीचा मार्ग तुमच्या मनाला शांततेचा अनुभव देण्यापासून सुरू होतो.

स्वतःला जर मानसिक शांततेचा अनुभव दिला तर आपल्या सभोवतालच्या व्यक्तींवर त्याचा प्रभाव पडून काहीअंशी आपण शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होऊ शकता, अस्थिर मन कधीही इतरांना शांतीचा संदेश देऊ शकत नाही. म्हणूनच सर्वप्रथम स्वतः ला प्रस्थापित करावे अन मगच पुढील पाऊल टाकावे.

It doesn't matter what you can do, it matters what you do. Quote #TM357

Quote #TM357

It doesn't matter what you can do, it matters what you do.

No change can be made if your ability is not in use, if you have the ability, it should be used immediately and the possibility should be worked upon to bring it into existence. The right time to start is when you realize your potential.

सुविचार ३५७ 

तुम्ही काय करूशकता हे महत्वाचे नाही, तर तुम्ही काय करत आहेत हे महत्वाचे.

आपली क्षमता जर वापरात नसेल तर कोणताही बदल घडवणे शक्य नाही, क्षमता असल्यास लगेचच तिचा वापर व्हायला हवा आणि शक्यता प्रत्यक्षात अस्तित्वात आणायला हवी. सुरुवात करण्याची योग्य वेळ तीच असते जेव्हा तुम्हाला क्षमतेची जाणीव होते

The universe started from zero, and our existence in the universe is also zero, but it is important to be aware of this zero. Quote #TM356

Quote #TM356

The universe started from zero, and our existence in the universe is also zero, but it is important to be aware of this zero.

Be it astrophysics or religious texts, everyone says that the universe came into being from nothing. And in this vast universe and on the scale of time, human existence is negligible. However, it is very important to create this understanding and awareness, so many disputes can be settled, internal and external.

सुविचार ३५६ 

विश्वाची सुरुवात शून्यातून झाली, आणि आपले अस्तित्वही विश्वात शून्यच आहे, मात्र ह्या शून्याची जाणीव होणे महत्वाचे.

खगोलभौतिकी असो किंवा धार्मिक ग्रंथ सगळेच म्हणतात कि विश्व शून्यातून अस्तित्वात आले. आणि ह्या अफाट विश्वात आणि वेळेच्या मोजपट्टीवर मानवी अस्तित्व नगण्यच. मात्र हि समज आणि जाण निर्माण होणे अतिशय महत्वाचे असून त्यामुळे अनेक वाद मिटूशकतात.

Preparing yourself for any situation is the simplest but most neglected solution. Quote #TM355

Quote #TM355

Preparing yourself for any situation is the simplest but most neglected solution.

One thing that is completely in your hands is yourself. If you decide how you should be, you are ready at every moment. We, however, focus entirely on equipping the outside stuff. Emphasis should be placed on empowering oneself mentally, physically and in other respects.

सुविचार ३५५


कोणत्याही परिस्थिती साठी स्वतः ला तय्यार करणे हा सर्वात सोपा मात्र दुर्लक्षित उपाय आहे.


एक गोष्ट जी पूर्णपणे तुमच्याच हातात आहे ती म्हणजे स्वतःच. आपण कसे असावे हे जर तुम्ही ठरवत असाल तर तुम्ही प्रत्येक क्षणी तय्यार असाल. आपण मात्र आपले लक्ष बाहेरील गोष्टीना सुसज्ज करण्यावरच संपूर्ण केंद्रित करतो. स्वतःला मानसिक शारीरिक आणि इतर बाबतीत सक्षम करण्यावर भर दिला जावा.

A helping hand is more important than advice. Quote #TM354

Quote #TM354

A helping hand is more important than advice.

The one who sinks deep always needs a helping hand, and that hand can be yours. Assuming that you have a compassionate right to the whole world so that no one has to re think differently about helping each other.

सुविचार ३५४

मदतीचा हात सल्यांपेक्षा महत्वाचा आहे.

खोलवर बुडणाऱ्याला नेहमी एक मदतीचा हात हवा असतो, आणि तो हात तुमचा असुदे. संपूर्ण जगावर तुमचाच करुणामय अधिकार आहे असे समजावे म्हणजेच कुणालाही मदत कारण्याच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागणार नाही.

The wind cannot be stopped, but the desired destination can be reached by adjusting your sails. Quote #TM352

Quote #TM352

The wind cannot be stopped, but the desired destination can be reached by adjusting your sails. 

Changing yourself should be the easiest thing to do, but many people seem to be trying to change the outside situation, a few could manage to change the outside situation but making oneself flexible can make a way out of any storms


 सुविचार ३५२

वाहत्या वार्याला थांबवता येत नाही, मात्र आपली शिडे समायोजित करून परिणाम साधता येतो.

स्वतः मध्ये बदल घडवून आणणे हि त्यामानाने सर्वात सोपी गोष्ट असायला हवी, मात्र सर्व लोक, परिस्थितीला बदलावण्याचा प्रयत करताना दिसून येतात. फक्त काही मोजक्याच वेळी परिस्थिती मध्ये बदल घडवून अनु शकतो. स्वतः ला लवचिक बनवल्यास वादळातून देखील मार्ग काढता येतो

Man could not fly in the air because of the wings, but he is flying today because of his strong will. Quote #TM353

Quote #TM353

Man could not fly in the air because of the wings, but he is flying today because of his strong will.

Strong will power is a way in itself, which can take us to the desired destinations. Your abilities can only work best when the engine of will power is attached to it.


सुविचार ३५३

माणूस पंखांमुळे हवेत उडू शकला नाही तर प्रबळ इच्छाशक्तीमुळे आज हवाई सफर करत आहे.

प्रबळ इच्छा शक्ती हा स्वतः च एक मार्ग आहे. जो इच्छित ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. आपल्या क्षमता तेव्हाच सर्वोत्कृष्ट काम करूशकतात जेव्हा इच्छा शक्तीचे इंजिन त्यांना जोडले जाते.

The quality of recognizing your mistakes and correcting them leads you to the peak of success. Quote #TM351

Quote #TM351

The quality of recognizing your mistakes and correcting them leads you to the peak of success.

Recognizing one's own faults means completing almost 90 percent of the work. The other 10 percent is to correct the mistake. The thick covering of our prejudices and ego unknowingly binds the mind from which there is no easy escape. But a person with the mental strength to break this veil can be one of many, which is seen to be successful.

सुविचार ३५१

आपली चूक ओळखून ती दुरुस्त करण्याचा गुण आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो.

स्वतः ची चूक ओळखणे म्हणजे जवळपास ९० टक्के काम पूर्ण करणे होय. इतर १० टक्के म्हणजे ती चूक दुरुस्थ करणे. आपल्या पूर्वग्रहदूषित आणि अहंकाराचे जाड आवरण मनाला अनभिज्ञपणे जखडून ठेवते ज्यातून सहजासहजी सुटका नाही. मात्र हे आवरण तोडण्याचे मानसिक बळ असलेला व्यक्ती अनेकांमध्ये एक असू शकतो, जी यशस्वी होताना दिसून येतो.

Sunday 2 May 2021

Only foresight can save you from big troubles. Quote #TM350

 Quote #TM350

Only foresight can save you from big troubles.

Foresight is not only a gift bestowed on human beings but many other creatures also use foresight in their struggle for survival. However, we have taken the lead in ignoring the first signs, but instead of doing so, we should try to plan for the future by making predictions on every step we see.

सुविचार ३५०

मोठ्या संकटां पासून दूरदृष्टीच वाचवू शकते.

दूरदृष्टी फक्त मानवाला लाभलेले वरदान नसून इतरही अनेक प्राणी आपापल्या अस्तित्वासाठी झगडत असताना दूरदृष्टी चा वापर करतात. मात्र आपण पाहूलखुणा दुर्लक्षित करण्यात अग्रेसर झालो आहोत, मात्र असे ना करता आपल्या निरीक्षणात दिसणाऱ्या प्रत्येक पाऊलखुणेवर अंदाज बांधून भविष्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करावा.

Complete what you started. Quote #TM349

 Quote #TM349 

Complete what you started.

The world has suffered more because of the habit of giving up something that started with enthusiasm and spontaneity. The ability of the human mind to maintain continuity is not fully utilized. Instead, focus on completing what you have started.

सुविचार ३४९ 

सुरुवात केलेली गोष्ट पूर्ण हि करा.

जोश आणि उत्स्फूर्ततेने सुरू केलेली गोष्ट अर्धवट सोडून देण्याच्या सवयी मुळे ह्या जगाचे अधिक नुकसान झालेले आहे. सातत्य टिकवण्याची मानवी मनाची क्षमता पूर्णपणे उपयोगात आणली जात नाही. मात्र असे न करता, सुरु केली गोष्ट पूर्ण करण्यावर जोर द्यावा.

Thursday 29 April 2021

कोरोना काळ- पुढील वाटचाल


परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. कोणतेही सरकार किंवा प्रशासन एकट्याने हे संकट थोपवणे म्हणजे वाहत्या वार्याला लहानश्या जाळ्यात पकडण्या सारखे आहे. कोरोनाच्या ह्या वादळाला थोपवायचे असेल तर पर्वत उभारावा लागेल. हा पर्वत दुसरे तिसरे कुणी नव्हे तर फक्त आणि फक्त सामान्य लोकच उभारू शकतात. सरकारी यंत्रणा तोकड्या आहेत. त्या लागलीच वाढवणे किंवा प्रगत करणे प्रत्यक्षात शक्य नाही. आणि सामान्य लोकांनी तशी परिकल्पना करण्यात वेळ घालवू नये. हि जबाबदारी आपण आणि शासन दोघांनी मिळून सांभाळायची आहे. शासन फक्त दिशादर्शक आहे तर प्रत्यक्षात शिडांची हालचाल तुम्हा-आम्हाला करायची आहे. तरच कोरोनाच्या ह्या उफ़ाळत्या महासागरातून जनसामान्यांची नाव तरून जाऊ शकेल. कोणताही अन्य पर्याय पूरक नाही हे ध्यानी असुदे. सर्व जबाबदारी इतरांची आणि सरकारची असे गृहीत धरण्याची सवय सोडून द्यावी.


आरोग्याच्या सोयी लोकांना उपलब्ध करून देण्याच्या कामाच्या वेगाची कोरोनाच्या प्रचंड संसर्ग वेगाशी तुलना करणे शक्यच नाही,

त्यामुळे संसर्गाला आळा घालणे प्राधान्य क्रमात प्रथम आहे. अकल्पित हानी होण्या आधी मोठा प्रयत्न होणे अनिवार्य आहे.


१. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या सातत्यासाठी संपर्करहित व्यवस्थेची निर्मिती करण्यावर भर दिला जावा. आणि तिचा वापर जवळपास अनिवार्य केला जावा. जनतेने जास्तीत जास्त अश्या व्यवस्थेचा वापर कसा करता येईल यावर लक्ष्य केंद्रित करावे. संपर्करहित व्यवस्थेत घरपोच वस्तू आणि सेवा पुरवल्या जाव्यात. मात्र अश्या व्यवस्थेत कार्य करणाऱ्या सर्व कामगार आणि निगडित व्यक्तींचे लसीकरण आणि वारंवार कोवीड चाचणी अनिवार्य करावी.


२. स्थानिक संपर्काचे महत्व: उच्च स्थरावर घेतलेला परिणामकारक निर्णय जोपर्यंत स्थानिक पातळीवरील शेवटच्या घटकांकडून अंमलात आणला जात नाही तोपर्यंत सगळंच निरर्थक. लोकसहभागाशिवाय कोरोनावर मात करणे शक्यच नाही. आणि याकामी अजूनतरी सर्रार्स वापरल्या जाणाऱ्या समाजमाध्यमाचा म्हणावा तितका प्रभावी वापर केलेला दिसून येत नाही. स्थानिक पातळीवर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल, प्रशासनाचे कनिष्ठ पातळीवरील अधिकारी, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींनी व्हाट्सअप ग्रुप बनवून त्यांच्या परिसरातील जास्तीत जास्त सोसायटी, मंडळे, दबावगट, सामाजिक संस्था, यांचे पदाधिकारी आणि  जास्तीतजास्त सामान्य नागरिक यांच्या पर्यंत त्यांच्या हातातील मोबाइलला द्वारे पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यात महत्वपूर्ण माहिती तर पाठवाविच मात्र नियम पाळणाऱ्यांचे कौतुक हि करावे आणि प्रोत्साहान द्यावे. नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांमध्ये वितरित करावी. नागरिकांमध्ये जबाबदारीचे वितरण हा या कामी सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहिचण्याचा व्हॅटस्सप हा एक प्रभावीमार्ग आहे. तसेच ह्या व्हॅटस्सप ग्रुप द्वारे कोविद काळात एकमेकांना अत्यावश्यक वेळी मदत हि पोचवता येऊ शकेल.


३. फैलाव रोखणे: ह्या अदृश्य शत्रूचा फैलाव होण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे परस्पर संपर्क, हल्लीच्या संशोधनानुसार हवेतून जरी प्रसार होत असेल तरीही लोकांनी एकमेकांच्या संपर्कात न आल्यास हा फैलाव मोठया प्रमाणात रोखला जाऊ शकतो. दुसरा कोणताही उपाय न करता फक्त ह्या एकाच उपायात संपूर्ण जनता सामील झाली तरीही फार मोठा परिणाम साधता येऊ शकेल. पण उपाय जितका परिणामकारक तितकाच तो अवघड हि. महिना भरासाठी एकमेकांशी संपूर्ण संपर्क तोडणे अशक्यच. जनसामान्यांमध्ये याविषयी परिपक्वतेचा अभाव असल्याने, फक्त बळाचा वापर करूनच हे शक्य आहे असे सरकारचे मत झालेले दिसून येते, मात्र बळाचा वापर करण्यावरही मर्यादा असल्याने किंवा तसे करूनही इप्सित परिणाम साधने अवघडच. कारण शिस्त पाळण्यापेक्षा मोडण्याकडे आमचा कल जास्त. असे गृहीत धरावे कि बळाचा वापर शून्य करून हे सध्या करायचे आहे.


लसीकरण: लसीकरण आणि चाचण्या घरोघरी जाऊन केल्या गेल्यास लवकरात लवकर परिणाम साधता येऊ शकेल. या कामी स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींच्या मनुष्य बळाचा वापर केल्यास मनुष्यबळाचा तुटवडा होणार नाही. फक्त याची नियमन शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्या मार्फत व्हावे.


प्रत्येकाने स्वतः ला सक्षम बनवावे. आपले आरोग्य सरकार आणि आरोग्य संस्थांवर न सोडता स्वतः हुन, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर द्यावा. कोरोनाच्या ह्या समस्येला एक-दोन वर्षांची समस्या न मानता पुढील १० पेक्षा अधिक वर्षांसाठी आपली रोगप्रतिकारशक्ती औषधांशिवाय उत्कृष्ट कशी ठेवता येईल याचे नियोजन करावे.


नागरिकांनी जागरूक होऊन सहभाग घेण्याची हि वेळ आहे. प्रत्येक नागरिक या युद्धातील महत्वाचा सैनिक आहे.

Corona times- Way forward

The situation is out of hand and efforts seem to be falling short. Preventing this crisis by any government or administration alone is like catching the wind in a small net. If we want to stop this storm of Corona, we have to raise mountains. This mountain can be built only by ordinary people and no one else. Government systems are fragmented, it is not really possible to increase or advance that immediately, and we people should not spend time imagining and expecting that to happen in such a short time. This responsibility should be handled by both, we and the government. The government is just a guide, but in reality, you and I should move the sailes. Only then can the ship of the general public be saved from this boiling ocean of the Corona. There is no other option. The habit of assuming all the responsibility is of others and the government should be given up.

The speed with which health facilities are made available to the public cannot be compared to the rapid transmission of the corona.

Therefore, controlling the infection is the first priority and a BIG effort must be made before unimaginable harm can occur.


1. Emphasis should be placed on creating a contactless system for the continuity of essential goods and services. And its use should be made almost mandatory. The public should focus on how to make the most of such a system. Household goods and services should be provided in a contactless system like home deliveries. However, vaccination and frequent covid testing should be made mandatory for all workers and persons working in such systems.


2. Importance of local communication: Effective decisions made at the highest level are meaningless unless implemented by the last elements at the local level. Corona cannot be defeated without public participation. And it doesn't seem to be using social media as effectively as it should be. At the local level, police constables, junior administration officials, as well as social leaders should form WhatsApp groups to reach out to as many societies, mandals, pressure groups, social organizations, office bearers and the general public in their area through their mobile phones. In addition to sending important information, those who follow the rules should be appreciated and encouraged. The responsibility of following the rules should be distributed among the citizens because the most effective solution to this crisis is to distribute responsibility among the citizens. WhatsApp is an effective way to reach more people. Also, this WhatsApp group can help each other in times of emergencies.


3. Preventing the spread: The most important way of spreading this invisible enemy is through interaction, according to recent research, even if it is spread through the air, this spread can be largely prevented if people do not come in contact with each other. Even if the entire population joins in this single measure without any other solution, it can have a huge impact. But the more effective the solution, the more difficult it is. It is impossible to completely cut off contact with each other for a month. Due to the lack of maturity in the masses, the government seems to believe that this is possible only through the use of force, but the use of force is limited or the means of coping are difficult to achieve. Because we are more inclined to break than to follow discipline. Assume that this is to be done by using zero force and use innovative ways.

4. Vaccination: Immediate results can be obtained if vaccinations and tests are done at home. If the manpower of local-level social workers and politicians is used in this work, there will be no shortage of manpower but it should only be regulated by a government medical officer.

5. Everyone should strengthen themselves. Instead of leaving your health to the government and health institutions, focus on boosting your immune system. Instead of treating corona as a problem for a year or two, plan for how to keep your immune system healthy for more than 10 years without medication.

It is time for citizens to be aware and participate. Every citizen is an important soldier in this war.

Obscurity erodes morale, while clarity boosts morale. Quote #TM348

Quote #TM348

Obscurity erodes morale, while clarity boosts morale.

Clarity about your abilities and thoughts keeps your mindset in the right state to find a way out of any situation. The most important reason behind raising morale is clear awareness.
Based on this awareness, it is possible to face a difficult situation. Therefore, you should be aware of your abilities.

सुविचार ३४८

अस्पष्टता मनोधैर्य खच्ची करते तर सुस्पष्ठता मनोधैर्य उंचावते.

आपल्या क्षमतेविषयी आणि विचारांमधील स्पष्टता कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपली मानसिकता योग्य अवस्थेत ठेवते. मनोधैर्य उंचावण्या मागे महत्वाचे कारण म्हणजेच सुस्पष्ठ जाणीव.
या जाणिवेच्या आधारे बिकट परिस्थीला तोंड देणे शक्य होते.त्यामुळे आपल्या क्षमतांची स्पष्ठ जाणीव करून घ्यावी.

Tuesday 27 April 2021

Growing awareness will show you a new and easier form of life. Quote #TM347

 Quote #TM347

Growing awareness will show you a new and easier form of life.

Getting caught in the trap of mental games is the biggest loss in life. You exist apart from feelings and thoughts. And as soon as you realize it, your life experience will change completely. And you will begin to enjoy life from a new perspective.


सुविचार ३४७

वाढती जाणीव तुम्हाला जीवनाचे नवीन आणि सुलभ रूप दाखवेल.

मानसिक खेळाच्या जाळ्यात अडकणे हेच आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान आहे. भावना आणि विचार यांच्या पेक्षा वेगळे तुमचे अस्तित्व आहे. आणि त्याची जाणीव होताक्षणीच तुमची जीवनाची अनुभूती संपूर्ण बदलून जाईल. आणि जीवनाचा आस्वाद एका नवीन दृष्टीकोनातून घेऊ लागलं.

Sunday 25 April 2021

We may be a big person but insignificant in the vast expanse of the universe. Quote #TM346

Quote #TM346

We may be a big person but insignificant in the vast expanse of the universe.

Every atom in our body is a gift from the universe, but our mental universe is self-created.
We try to become very big in the mental universe due to a lack of realization of our insignificant existence on the universal scale and underestimate the cosmic forces. This awareness of your smallness brings spiritual peace in life.

सुविचार ३४६ 
कदाचित आपण खूप मोठे व्यक्ती असू मात्र विश्वाच्या अफाट पसाऱ्यात नगण्य.

आपल्या शरीरातील प्रत्येक अणू ह्या विश्वाची देणं आहे, आपले मानसिक विश्व मात्र स्व निर्मित.
अगदीच नगण्य अस्तित्व असलेले आपण मानसिक विश्वात फार मोठे बनू पाहतो आणि वैश्विक बलांना कमी लेखू लागतो. आपल्या खुजेपणाची जाण हि आत्मिक शांती मिळवण्याचा पर्याय आहे.

It is important to have patience to do the right and necessary things. Quote #TM345

Quote #TM345

It is important to have patience to do the right and necessary things.

Patience means making decisions by keeping oneself stable. The basic premise of restraint is the ability to observe the situation by detaching oneself from any external or internal fluctuations. Patience helps to make the right decision in order to get the desired result.

सुविचार ३४५

योग्य आणि गरजेच्या गोष्टी आपल्याकडून होण्यासाठी संयम असणे फार महत्वाचे आहे.

संयम म्हणजे स्वतःला स्थिर ठेवून निर्णय घेणे. कोणत्याही बाह्य अथवा अंतर्गत चलबिचली पासून स्वतःला अलिप्त ठेवून परिस्थितीचे अवलोकन करण्याची क्षमता हीच संयमाचा मूलभूत आधार आहे. आणि संयमामुळेच योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि परिणामी इच्छित परिणाम साधला जातो.

Don't forget that you are your own best friend in difficult times. Quote #TM 344

Quote #TM 344

Don't forget that you are your own best friend in difficult times.

Whether one comes to help or not in difficult times, you should not give up your perseverance and hope. It is difficult to overcome a difficult time with a lost mind, but if you persevere, a ray of hope will surely show you the way.


सुविचार ३४४

कठीण समयी स्वतः चा सर्वात मोठा सोबती तुम्ही स्वतः आहेत, विसरू नका.

कठीण समयी कोणी कामास येवो अथवा ना येवो, तुम्ही तुमची जिद्ध आणि आशा सोडून स्वतः ची साथ सोडू नये.

हताश मनाने कठीण वेळेवर मत करणे अवघड आहे, मात्र जिद्ध कायम ठेवल्यास आशेचा किरण नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवेल.

If truth is not pleasing to our ego, then we should give up ego before denying it. Quote #TM343

Quote #TM343

If truth is not pleasing to our ego, then we should give up ego before denying it.

The ego is one of the major factors that give direction to life. The ego casts a heavy veil over our eyes which makes it difficult to see things in their original form. So, at least once, everyone must look at everything that you don't agree with, from an egoless eye.

सुविचार ३४३

सत्य हे आपल्या अहंकाराला रुचत नसेल तर ते नाकारण्याआधी अहंकार सोडून पाहावा.

अहंकार हा जीवनाला दिशा देणाऱ्या मोठ्या घटकांपैकी एक आहे. अहंकार आपल्या डोळ्यांवर घट्ट आवरण चढवतो ज्यामुळे गोष्टी त्यांच्या मूळ स्वरूपात पाहता येणे अवघड होते. म्हणून एकदा का होईना प्रत्येकाने स्वतः ला न पटणाऱ्या गोष्टीला अहंकारविरहित भावाने जरूर पाहावे.

Constantly evolving is the sign of vitality. Quote #TM342

Quote #TM342

Constantly evolving is the sign of vitality.

Every breath is a new impetus for the processes within the body, with each breath every cell is filled with new energy and we call all these collectively the process of life, that is, basically every moment you are filled with new energy and your fundamental nature is to keep evolving your energies.


सुविचार ३४२

सतत विकसित होत राहणे हाच जिवंतपणाचे लक्षण आहे.

प्रत्येक श्वास म्हणजे शरीरांतर्गत प्रक्रियांसाठी नवीन उमेद असतो, प्रयेक श्वासासोबत प्रत्येक पेशी नवीन ऊर्जेने भरून जात असते आणि आपण ह्या सर्वाना एकत्रित पाने जीवनाचे नाव देतो, म्हणजेच मूलभूत रित्या प्रत्येक क्षसनाला नवीन ऊर्जेने भरीत होत विकसित होत राहणे हाच तुमचा मूळ स्वभाव आहे.

Sunday 18 April 2021

Winning is the result of your mental state. Quote #TM341

Quote #TM341

Winning is the result of your mental state.

Often we see situations in which many gave up in spite of having the ability, the main reason for such defeats can be not able to reach and maintain the right mental state during such situations. The winning mentality can be different for each occasion, sometimes aggressive, sometimes steady and sometimes alert. And maintaining the right mental state helps to achieve victory.

सुविचार ३४१ 

जिंकणे हा तुमच्या मानसिक अवस्थेचा परिणाम आहे.

अनेकदा असे प्रसंग आपण पाहतो ज्यात क्षमता असून देखील हार पत्करावी लागते, याचे मुख्य कारण आहे कि प्रसंगादरम्यान योग्य ती मानसिक स्थिती गाठणे आणि कायम ठेवणे. जिंकण्यासाठी लागणारी मानसिकता प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळी असू शकते, कधी आक्रमक, कधी स्तिर तर कधी सतर्क.  आणि योग्य ती मानसिकता विजयश्री साकारण्यास मदत करते.



Happiness cannot be obtained from the outside, it is created. Quote #TM340

 Quote #TM340 

Happiness cannot be obtained from the outside, it is created.

We associate our happiness with external things that change according to the situation, and this creates the impression that the mind is happy only when external things become like our mind. That is, the factory of happiness rises outside our minds. But this chemical process of happiness takes place within us, and it is controlled from within.


सुविचार 340


आनंद हा बाहेरून मिळत नसतो तर तो निर्मित होत असतो.

परिस्थिती नुसार बदलणाऱ्या बाह्य गोष्टींशी आपला आनंद आपण जोडतो, आणि त्यामुळे असा भास निर्माण होतो कि बाह्य गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तरच मन आनंदी होते. म्हणजेच काय तर आनंदाची फॅक्टरी आपल्या मनाच्या बाहेर उभारतो. मात्र आनंदाची हि रासायनिक प्रक्रिया आपल्या अंतर्गतच होत असते, आणि तिचे नियमन  हि आतमधूनच होत असते.

Our psychology is an illusion like a rainbow, perhaps more realistic. Quote #TM 339

Quote #TM 339

Our psychology is an illusion like a rainbow, perhaps more realistic.

Love, happiness, sorrow, anger, greed, contentment, all these emotions and mental states are waves floating on the illusionary surface of the mind, it can only be experienced within us, it has nothing to do with the real cosmos, just like the colours of the rainbow seem real but actually, it doesn't exist.


सुविचार 339

आपले मानसिक विश्व् म्हणजे इंद्रधनुष्यासारखा भास आहे, कदाचित जास्त खरा वाटणारा.

प्रेम, सुख, दुःख, राग, लोभ, समाधान या सगळ्या भावना आणि मानसिक अवस्था एक भासमान प्रतलावर उमटणारे तरंग आहेत, त्याचा अनुभव फक्त आपल्या आतमध्येच घेता येतो, प्रत्यक्ष विश्वाशी मात्र त्याचा काही संबंध नाही अगदी जसे इंद्रधनुष्यातील रंग खरे वाटतात मात्र प्रत्यक्षात त्यांचे अस्तित्व असत नाही.

Maintaining an average mental state, even in difficult situations, is the ability to endure stress. Quote #TM 338

Quote #TM 338 

Maintaining an average mental state, even in difficult situations, is the ability to endure stress.


Stressful situations affect your emotions in the first place, and controlling emotions is like changing the direction of the wind. But if you cultivate a deep sense of self-detachment, you will be able to control your emotions by looking at the outside world as a witness.

सुविचार ३३८ 

बिकट परिस्थिती सुद्धा सर्वसाधारण मानसिक अवस्था कायम ठेवणे म्हणजेच तणाव सहन करण्याची योग्यता.


तणावयुक्त परिस्थिती सर्वप्रथम आपल्या भावना प्रभावित होतात आणि त्याना नियंत्रित ठेवणे म्हणजे वाऱ्याची दिशा बदलण्यासारखे आहे. मात्र मनात खोलवर त्यागवृत्ती जोपासल्यास बाह्यपरिथिती ला एक साक्षीदारा प्रमाणे पाहून आपल्या भावना नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.

Tuesday 13 April 2021

Achieving more comfortable living isn't an effective goal, one must work on enhancing awareness about life. Quote #TM337

 Quote #TM337

*Achieving more comfortable living isn't an effective goal, one must work on enhancing awareness about life.*

Awareness makes everything transparent. Your higher level of awareness will keep you out of resistance. Even if there is friction, your nature will remain silent due to your increased awareness.

सुविचार ३३७ 

*अधिक आरामदायक जीवन मिळवणे हे एक प्रभावी ध्येय नाही, एखाद्याने जीवनाबद्दल जागरूकता वाढविण्यावर कार्य केले पाहिजे.*

जागरूकता सर्वकाही पारदर्शक बनवते. आपली उच्च पातळीची जागरूकता आपल्याला प्रतिकार करण्यापासून दूर ठेवेल. जरी भांडण होत असले तरीही, आपल्या वाढत्या जागरूकतामुळे आपला स्वभाव शांतच राहील.

There is something beyond the feelings and thoughts. That's real you. Absolutely still. Quote# TM336

Quote# TM336

*There is something beyond the feelings and thoughts. That's real you. Absolutely still.*

Understanding the process of life itself is so mysterious that we should not misinterpret it simply as a psychological complication. Constantly changing thoughts and emotional states are just a surface wave, our real existence is hidden even deeper.

सुविचार ३३६

*भावना आणि विचारांच्या पलीकडे काहीतरी आहे. जे खरं आहे अगदी स्तब्ध.*

आयुष्याची प्रक्रिया स्वतः समजून घेणे इतकी रहस्यमय आहे की आपण केवळ मनोवैज्ञानिक क्लिष्ठता म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. सतत बदलणारे विचार आणि भावनिक स्थिती ही केवळ पृष्ठभागाची लाट असते, आपले वास्तविक अस्तित्त्व अगदी खोलवर दडलेले आहे.

Saturday 10 April 2021

It is a self- insult to crawl despite having the ability to stand firmly. Quote #TM335

Quote #TM335

 *It is a self-insult to crawl despite having the ability to stand firmly*

Rather than crawling and being safe on an ideological level, Stumbling to stand by our own is anytime better. It will take a lot of hard work to stand on a personal ideological level, but no matter how hard you try, trying to make yourself strong will definitely take you beyond the crawlers.

सुविचार
 *उभे राहण्याचे सामर्थ्य असून सुद्धा रांगत राहणे हा स्वतः चा अपमानच म्हणावा लागेल *

वैचारिक पातळीवर रांगून सुरक्षित राहण्यापेक्षा धडपडत उभे राहणे केव्हाही चांगले. वैयक्तिक रित्या उभे राहण्यासाठी नक्कीच जास्त मेहनत करावी लागेल मात्र धडपडत का होईना स्वतः ला प्रगल्भ बनवण्याचे प्रयत्न नक्कीच तुम्हाला रांगणाऱ्यांपेक्षा पुढे नेऊन सोडतील.

Some simple things​ have the power to make a big difference. Quote #TM334

 Quote #TM334


​*Some simple things​ have the power to make a big difference.*

Our whole life can be changed if we change some of the things that we do every day but do not notice easily. Just like your sitting posture, if you just sit up straight, you can avoid hundreds of diseases, or if you always chew for a long time while eating, stomach and other major body problems will not occur, and if you smile for only 10 seconds every morning, you will feel energetic. By doing so many small things we can make a big difference in our lives.

सुविचार
*काही सोप्या गोष्टींमध्ये मोठे बदल घडवण्याची सुप्त शक्ती असते.*

आपण रोज करत असलेल्या मात्र सहज लक्ष्यातहि न येणाऱ्या काही गोष्टींमध्ये बदल केल्यास आपले संपूर्ण जीवनाचं  बदलून  जाऊ  शकते. जसे आपली बसण्याची पद्धत, फक्त नेहमी ताठ बसल्यास शेकडो रोगांपासून दुसरं राहता येते, किंवा जेवताना नेहमी जास्त वेळ चावून खाल्यास, पोटाच्या आणि शरीराच्या इतर मोठ्या समस्या उद्भवणारच नाहीत, तसेच रोज सकाळी फक्त १० सेकंड स्मित केल्यास उर्जावान असल्याचे जाणवेल. अश्या अनेक लहान गोष्टी करून देखील जीवनात आपल्याला मोठं बदल घडवता येऊ शकतो.

While managing what is happening in the world, you also need to be aware of what is happening inside you. Quote #TM333

 Quote #TM333


*While managing what is happening in the world, you also need to be aware of what is happening inside you.*

Since our intellect is projected externally, we spend time and effort in planning all the external things, but let us not ignore the fact that true happiness and success comes from managing the things that are going on inside us.

सुविचार
जगात काय घडावं याची व्यवस्था करण्या सोबतच आपल्या आतमध्ये काय घडावं याची सुद्धा जाणीव ठेवावी.

आपली प्रज्ञा हि बाह्य प्रदर्शित होत असल्याने बाहेरील सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात आपण वेळ खर्च करून कष्ट हि करत असतो, मात्र खरा आनंद आणि यश आपल्या अंतर्गत चाललेल्या गोष्टींचे व्यवस्थापन केल्याने होत असते हे ध्यानी असुदे.

Thursday 8 April 2021

If you are not happy from the inside, nothing on the outside can make you happy. Quote #TM332

Quote #TM332

*If you are not happy from the inside, nothing on the outside can make you happy.*

We think if something is happening as per our wish, then it is happiness.  But if we are calm and stable deep inside, it does not make much difference even if the external things do not happen as per our wish, as no one has control over the outside world in actuality. So everyone should study and strive for inner stability which will create a permanent touch of happiness.

सुविचार ३३२

*जर आपण आतून आनंदी नसाल तर बाहेरील कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंद देवू शकणार नाही.*

मनासारखे होणे म्हणजे आनंदी होणे असा एक समज निर्माण होतो. मात्र खोलवर मनात एक स्थिरता असेल तरीही बाहेरील गोष्ठी मनासारख्या झाल्या नाहीत तरी फारसा फरक पडत नाही.
आणि बाहेरील गोष्टींचे नियंत्रण कुणाकडे ही नसते. त्यामुळे अंतर्गत स्थिरता आणि आनंद कसा मिळू शकेल याचा प्रत्येकाने अभ्यास करून त्यासाठी प्रयत्न करावा.

Wednesday 7 April 2021

Allow yourself to be transformed. Quote#TM331

Quote #TM331

*Allow yourself to be transformed.*

We want change in many walks of our life, but we hold our old selves very tight and resist the change, unknowingly.  To shift our being, it is necessary to let go of the 'old self' that is rooted in our individuality, and only then can the desired transformation take place.

सुविचार ३३१

*स्वतःला रूपांतरित होऊ द्या*

आपल्याला जीवनातली बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन हवे असते. मात्र आपण स्वतः तितकच घट्ट रोखून ठेवत बदलास विरोध करतो, नकळतपणे. वृत्ती बदलण्यासाठी स्वतः मधील चिकटून बसलेला 'जुना मी' सोडणे अनिवार्य आहे. आणि त्या नंतरच हवे असलेले परिवर्तन होणे शक्य आहे.

Tuesday 6 April 2021

It cannot be a great work if you are not putting your heart into it.Quote #TM330

Quote #TM330

*It cannot be a great work if you are not putting your heart into it*.

One can put his heart into a work that is closest to his heart. This means it should not be driven by other external forces, such as prestige, lust, selfishness, etc. The heart can be involved only if the mind has a passion for work or one develops the passion later. Thereafter the work automatically begins to get better.

सुविचार ३३०

*जर आपण आपले हृदय समर्पित करत नसाल तर ते एक महान कार्य होऊ शकणार नाही.*

हृदय समर्पित करू शकू असे काम तेच असू शकते जे आपल्या हृदयाच्या जवळ असेल. म्हणजेच त्या कार्याला इतर कोणतीही बाह्य शक्ती, जसे, पत प्रतिष्ठा, लालसा,स्वार्थ प्रभावित करीत नसेल. मनात कार्या प्रती ओढ असेल किंवा नंतर ती निर्माण झाली असेल तरच त्यात हृदय गुंतू शकते. आणि कार्य आपोआपच उत्कृष्ट होऊ लागते. 

Monday 5 April 2021

Gratitude makes life blissful. Quote #TM329

Quote #TM329

*Gratitude makes life blissful.*

Every aspect of your life is influenced by someone else.  Even our birth is a gift from others.  The moment we identify ourselves as something it takes us away from reality.  The fact is that our very existence is basically an illusion that is created by the nature by putting some atoms together, this awareness and gratitude towards everything establishes inner peace.

सुविचार ३२९


*कृतज्ञता जीवन आनंदमय बनवते.*

आपल्या जीवनातल्या प्रत्येक पैलूवर इतर कुणाची तरी छाप असते. अगदी आपला जन्म ही सुध्दा इतरांची देणगी असते. आपण काहितरी असल्याची जी जाणीव आपल्या मनात उभी राहते ती आपल्याला वास्तवा पासून दूर करते. खरे वास्तव तर हेच आहे की आपले अस्तित्वच मुळात ह्या सृष्टीतील अणूरेणूनचे रचेलेला एक भास आहे. याची जाणिव आणि कृतज्ञता एक अंतर्गत शांतता प्रस्थापित करते.

Sunday 4 April 2021

Take the chance when you see it. Quote #TM328

Quote #TM328

*Take the chance when you see it.*

Opportunities often come in the form of extra work and sometimes in the form of problems.  Basically it is difficult to identify opportunities without having a participatory attitude towards the work.  And it is against destiny to let go of the opportunity once it is recognized.  Because destiny only opens its doors to a competent person.

सुविचार ३२८

*संधीची ओळख पटताच सहभागी व्हा.*

येणारी संधी बऱ्याचदा अतिरिक्त कामाच्या तर कधी समस्येच्या स्वरूपात अशी छुप्या मार्गाने येत असते.  मुळात कर्माप्रती सहभागी वृत्ती असल्याशिवाय संधी ओळखणे अवघड. आणि संधीची ओळखं पटल्यावर ती सोडून देणे म्हणजे नियती च्या विरूद्ध.  कारण नियती फक्त सक्षम व्यक्तीकडेच आपली संधी खुली करते.

Saturday 3 April 2021

The future can be created based on the past, not by staying in the past. Quote #TM327

Quote #TM327

*The future can be created based on the past, not by staying in the past*

It's hard to move forward by looking at the back. But the experience gained at every turn in the past will be useful for the next journey.  So just walk with the experience and leave the past behind.

सुविचार ३२७

*भविष्य निर्मिति भूतकाळाच्या आधारे करता येते, भूतकाळात राहून नाही*

मागे वळून पाहताना पुढे जाणे अवघड. मात्र मागील प्रत्येक वळणवर मिळालेला अनुभव
पुढील वाटचालीसाठी उपयोगाचा असेल. म्हणून फक्त अनुभव सोबत घेऊन चालावे आणि भूतकाळाला तिकडेच सोडून द्यावे.

Friday 2 April 2021

Failures are part of success.Quote #TM326

Quote #TM326

*Failures are part of  success*

Learning a lesson and using it to build success can be considered as a whole cycle of success. Obstacles and missed directions both reinforce many aspects of success, so failure should be seen as an integral part of success.

सुविचार ३२६

*अपयश म्हणजे यशाचाच भाग होय*

धडा शिकणे आणि त्यातून पुढे यश घडविणे यालाच यशाचे पूर्ण चक्र समजू शकतो. वाटेतील अडथळे आणि चुकलेली वाट हे दोन्हीं ही यशाच्या शिखरावर जाणाऱ्यांच्या अनेक पैलूंना सशक्त बनवते म्हणूनच यशाच्या मार्गावरील अविभाज्य घटक म्हणून अपयशाला पहावे.

Wednesday 31 March 2021

Only when a person wants to be limitless can he realize his true potential .Quote#TM325


Quote#TM325

*Only when a person wants to be limitless can he realize his true potential*.

Drawing conclusions about your abilities means to stand on the last rock beyond which no possibility exists.  Belief-conclusion determines the boundary line of one's ability.  But once we become fully aware of our potential, a vast field of opportunity opens up which allows us to run on the path of true limitlessness and show the courage to leap beyond the rocks of belief, because the awareness of ability is the awareness of having wings.

सुविचार ३२५

*जेव्हा एखादी व्यक्ती अमर्याद होऊ इच्छिते तेव्हाच तिला तिची खरी क्षमता जाणवु शकते*.

स्वतः च्या क्षमते विषयी निष्कर्ष काढणे म्हणजे शेवटच्या खडकावर उभे राहणे ज्याच्या पलीकडे कोणतीही शक्यता अस्तित्वात नाही.  विश्वास-निष्कर्ष एखाद्याच्या क्षमतेची सीमा रेखा निश्चित करते. परंतु एकदाका आपल्या क्षमतेबद्दल स्पष्ट जाणीव झाली की संधींचे एक मोठे क्षेत्र खुले होते ज्यामुळे आपण खऱ्या अर्थाने अमर्याद होण्याच्या मार्गावर धावू लागतो अन् विश्वासाच्या खड्का पलीकडे झेप घेऊन उंच उडण्याचे धैर्य दाखवतो कारण क्षमतेची जाणीव म्हणजेच पंख असल्याची जाणीव होय.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...