Saturday, 15 January 2022

संदर्भ


संदर्भ लागल्या शिवाय आपल्याला गोष्टींची उकल होणे जरा अवघडच. अचानक कुणीतरी व्यक्ती आपल्याला रस्त्यावर भेटते, आपल्याशी बोलते मात्र ती व्यक्ती या आधी आपल्याला नेमकी कोठे भेटली होती याचा संदर्भ कधी कधी आपल्याला सापडत नाही. अन खूप विचार केल्यानंतर अचानक आठवते कि कोणत्यातरी कार्यक्रमा दरम्यान तुमची भेट त्या व्यक्तीशी झाली होती, म्हणजेच संदर्भ सापडतो.

संदर्भ म्हणजेच भूतकाळातील माहितीचे संकलन होय. मनाच्या भल्यामोठ्या कोठारात अनेक प्रसंग माहिती स्वरूपात साठवून ठेवले जातात तेही बऱ्याचदा आपल्या नकळतच. पुढे ह्याच माहितीच्या आधारे आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू नकळतच घडत जातात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून संस्कारांना अत्यंत महत्व दिले जाते. मुलं लहान असल्यापासून त्याच्या मनावर सुसंस्कार व्हावेत याकरिता अनेक परंपरा निर्माण केल्या गेल्यात. काही अपवाद वगळता, हल्ली अश्या स्वरूपाची कोणतीही सक्षम व्यवस्था दिसून येत नाही त्यामुळे व्यक्ती लहानपणा पासूनच तंत्रज्ञानाच्या ह्या युगातील माहितीच्या महासागरातून मिळेल ती माहिती संकलित करून त्याचा संदर्भ म्हणून भावी आयुष्यात वापर करते. त्यामुळे तरुण पिढी आजकाल थोडी स्वैर वागु लागत असेल तरी वावगे वाटू नये. कुटुंब संस्थेतहि सुसंस्कारांच्या परंपरांची व्यवस्था लोप पावल्यामुळे पुढे सामाजिक आणि राष्ट्रीय स्थरावर तिचे अस्तित्व धूसर होऊ लागले आहे. त्यामुळे अश्या उपलब्ध माहितीचा स्वयं संचित संदर्भ व्यक्तीच्या आयुष्यात दूरगामी परिणाम करीत असल्यामुळे कधी कधी उपलब्ध माहितीचा आधार जर भ्रम असेल तर व्यक्ती दिशाहीन होण्याची शक्यताच जास्त. आणि त्याहून कठीण परिस्थिती हि असेल कि दिशाहीन असूनही मार्गस्थ असल्याचा भ्रम मात्र सतत या व्यक्तीला होत राहील.

वरील बाब दृष्टी भ्रमाच्या उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूयात,

वरील चित्रात दिसणाऱ्या 'A' आणि 'B' या दोन्ही चौरसांचा रंग कोणता असे विचारल्यास, काळा आणि पांढरा असे उत्तर अनेकांकडून मिळते. प्रत्यक्षात मात्र ह्या दोन्ही चौरसांचा रंग अगदी एकसारखाच आहे. मात्र यावर मन विश्वास ठेवायला तयार होत नाही कारण त्या दोन्ही चौरसांना आपण त्याच्या शेजारील चौरसाच्या संदर्भातून पाहत असतो. शेजारील चौरसां कडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आपण स्पष्ट अगदी स्पष्ट पणे काळा किंवा पांढरा हे अगदी परस्पर विरोधी रंग पाहतो, तेही एकसारख्या असणाऱ्या चौरसांमधूनच.

आपल्या मनात सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत जी माहिती एकत्रित केली गेली आहे ती अश्याच संदर्भांचं काम करीत असते आणि आपल्या मानसिक विचारसरणीला आणि व्यक्तिमत्वाला काळ्या किंवा पांढऱ्या स्वरूपात उभारणी देत असते. संदर्भांच्या अभेद्य भिंतींना भेदून जीवनाकडे स्पष्ट पणे पाहता यावं या करीत आपण सर्वानी प्रयत्न करायला हवा. आपल्या व्यक्तिमत्वाचे, जातीधर्माचे, सामाजिक आणि आर्थिक असे अनेक भ्रमित करणारे संदर्भ मनात खोलवर रुजले जातात आणि त्या पलीकडे पाहणे अवघड होऊन बसते. स्वतः च्या क्षमतांच्या बाबतीत, इतर व्यक्तीच्या अथवा गोष्टींच्या बाबतीत भूतकाळातील संदर्भ हाच एकमात्र संपूर्ण आधार न मानता तटस्थ राहून अनुमान लावल्यास बाबी अधिक स्पष्टपणे दिसू लागतील. तसेच मनाच्या गाभाऱ्यात साठलेल्या संदर्भांना एकदा तपासून हि घ्यावे कदाचित भ्रमाचा घट्ट पगडा दूर होऊ शकेल आणि जीवनाला नव्याने आणि अधिक स्पष्ठतेणे पाहता येऊ शकेल आणि या आधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हि तुम्ही नव्याने शक्य करू शकाल अन स्वतः कडे पाहण्याचा तुमचा संदर्भ च बदलेल.



Tuesday, 11 January 2022

The most beautiful thing about life is you are free to alter your life at any moment. Quote #TM388

Quote #TM388

*The most beautiful thing about life is you are free to alter your life at any moment.*

Often we entrap in the fabric of self-constructed social and psychological illusions and forget to practice the freedom of choice empowered by nature.  In fact, it looks like that there is no freedom of choice because of deeply rooted habits and insecurities.  But in reality, you can decide to change your life at any moment.

सुविचार ३८८

 *आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे जीवन कोणत्याही क्षणी बदलण्यास मोकळे आहात.*

मानवनिर्मित सामाजिक आणि मानसीक धाग्यांमध्ये गुरफटून गेल्याच्या अभासा मुळे, निसर्गाने प्रदान केलेल्या निवडीच्या स्वातंत्र्याचा बऱ्याचदा विसरच पडतो. किंबहुना खोलवर रुतलेल्या सवयीआणि असुरक्षितते पोटी निवडीचे स्वातंत्र्य नाहीच की काय असे भासू लागते. परंतु कोणत्याही क्षणी आयुष्य बदलण्याचा निर्णय घेण्यास तुम्ही समर्थ असता हेच वास्तव आहे.

Friday, 20 August 2021

आर्यभट्ट



१९७५ साली भारताचा पहिला उपग्रह सोवियेत युनियन च्या मदतीने अवकाशात झेपावला आणि महान भारतीय गणित तज्ज्ञ आणि खगोलशात्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव उपग्रहाला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा एक लहानसा प्रयत्न केला. 

आजच्या पिढीला आर्यभट्ट आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात नव्याने ओळख करून द्यावी लागेल, कारण इतिहासाच्या पानांवर आर्यभट्ट आणि त्यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वाना जागा उरलेली दिसत नाही. काही ठिकाणी तुटपुंजा उल्लेख आढळतो.

आर्यभट्टांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसे पुरावे उपलब्ध नसल्याने अंदाजे इसवीसन पूर्व ४७६ साली त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यांनी त्यांच्या ७४ वर्षाच्या जीवनकाळात तत्कालीन प्रस्थापित विचारधारे सोबत न वाहून जाता अनके गूढ रहस्यांची उकल स्वतः केली. त्यांचे कार्य पाहिल्यास ते त्या काळातील नाहीच असे वाटू लागते.


जर आज तुम्हाला सांगितले कि पृथ्वी सूर्याभोवती किती वेळात प्रदक्षिणा पूर्ण करते याचे उत्तर स्वतः हुन शोधा, तर कदाचित आपण विचारात पडू. मात्र आज पासून दोन हजार वर्षांपूर्वी आणि आपण शाळेत शिकलेल्या कोपर्निकस ने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगण्याच्या एक हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टाने पृथ्वी प्रदिक्षिणेचा जो काळ सांगितलं तो  आहे, ३६५.२५८५८ दिवस आणि आजची अद्ययावत उपकरणे आणि वापरून मोजलेला काळ आहे ३६५.२५६३६ दिवस, म्हणजे ३ मिनिटे २० सेकंदांचा फरक. तसेच आर्यभट्टाने मोजलेला एक दिवसाचा कालावधी होता २३ तास 

५६ मिनिटे आणि ४.१ सेकंड्स, आज आधुनिक पद्धतीने गणला गेलेला काळ आहे २३ तास ५६ मिनिटे ४.०९१ सेकंड, आत्ता आपणच शोधावे नेमका किती मायक्रोसेकंदांचा फरक आहे ते. दोन हजार वर्षांपूर्वी गुप्त काळातील समृद्ध पाटलीपुत्र या राजधानीत राहत आणि शिष्याना आपली शिकवण देत आधुनिक गणित आणि खगोलशास्त्रालाही सहज सोपे न वाटणारे त्रिकोणमिती आणि बीजगणितातील संकल्पनांचाअचूक शोध घेतला. ग्रहणे आणि इतर ग्रहांचे सूर्याभोवती फिरण्याची गणिते मांडलीत, पाय ची किंमत निर्धारित केली, शून्याचा वापर प्रचलित केला.

त्याकाळी आपला सिद्धांत आणि शोध मोजक्या शब्दांत श्लोकबद्ध करण्याची उपयुक्त रीत प्रचलित असल्याने आर्यभट्टाने आपले संशोधन श्लोकबद्ध केले. ज्यातील अनेक रचना आज काळाच्या ओघात नष्ट झाल्या असून १०८ श्लोकांचा आर्यभटीय आणि आर्यसिद्धांत हे ग्रंथ आजही अभ्यासास उपलब्ध आहेत. अनेक परकीय विद्यापीठांनी आर्यभट्टाच्या कार्याची दाखल घेत अनेक शोध निबंध प्रसिद्ध केलेलं आहेत आपण ते जरूर अभ्यासावे. आणि प्राचीन मात्र प्रगत भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यावी.

Wednesday, 18 August 2021

प्राचीन विज्ञान: भाग एक.


प्राचीन विज्ञान

विद पासून उगम पावलेल्या वेद शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असाच आहे जसा scientia ह्या लॅटिन शब्दापासून तय्यार झालेल्या सायन्स शब्दाचा आहे. मात्र वेदांची शात्रोक्त बांधणी आधुनिक विज्ञानाच्या उगमाच्या हजारो वर्षां पूर्वी च झाली होती. आधुनिक विज्ञान आणि पौर्वात्य आत्मिक ज्ञान हे परस्पर विरोधी मानावेत कि एकाच वृक्षाच्या दोन फांद्या म्हणाव्यात. एकाला तार्किक चौकटीतून तर दुसऱ्याला तर्कविसंगतीतून पाहावे काय? याविषयी उहापोह पुढील लेखांमध्ये आपण करूच. किंबहुना ती काळाची गरजच आहे म्हणा. भौतिक शास्त्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ नील्स बोहर, ताओ ऑफ फिज़िक्स (१९७५) या पुस्तकात, “I go to the Upanishad to ask questions.” असे का म्हणतो याचे उत्तर शोधावेच लागेल. प्राचीन विज्ञान लेखांच्या मालिकेच्या माध्यमातून अश्याच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या गेलेल्या वेदांच्या रचनेमागिल कारण थोडक्यात पाहुयात, म्हणजे पुढील अभ्यास सोपा ठरेल. वेद शब्दापासून विद्या म्हणजेच अर्जित ज्ञान, आणि ज्ञानार्जन केलेला व्यक्ती विद्वान असे शब्द रचले गेलेत. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आजच्या काळातील कोणतेही अद्ययावत भौतिक उपकरण अस्तित्वात नव्हते. तेव्हाही मानवाला अनेक प्रश्न पडत असत. मात्र Google  करून उत्तर शोधणे शक्य नसल्यामुळे जीवनाशी संबंधित प्रश्नांची उकल करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करीत आणि अतोनात प्रयत्न करून त्याला जे ज्ञान प्राप्त होई ते आत्मिक ज्ञानावर आधारित असे. म्हणजेच जाणिवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष आकलन केलेले. पुढील पिढीला हे प्राप्त ज्ञान द्यायचे असल्यास तेही प्रत्यक्ष जाणिवेच्या माध्यमातूनच दिले जाई, कोणत्याही प्रकारे निव्वळ विश्वास न ठेवता.

प्रत्येक विषयावर हजारो प्रश्न उपस्थित करून जो पर्यंत समाधानपूर्वक उत्तर मिळत नाही तो पर्यंत कोणतेही सांगितले गेलेलं ज्ञान अर्जित केले जात नसे. जगात क्वचितच कोठे अश्या प्रकारे शिक्षण देण्याची प्रथा असावी.

भारतीय भूमीवर जन्मलेली कोणतीही संकल्पना किंवा तत्वज्ञान अस्तित्ववादाच्या प्रखर परीक्षेतून गेल्यावरच मान्य होत असे. निव्वळ परिकल्पना म्हणून नव्हे. कदाचित पुढे आत्मज्ञानाने प्राप्त झालेले कल्याणकारी आत्मसाक्षात्कार सामान्यांना समजण्यास सोपे आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रतीके आणि गोष्टी च्या स्वरूप सांगितले जाऊ लागले. वेळ आणि अवकाशाचा अल्बर्ट आईन्स्टाईन चा सापेक्षता वादाचा सिद्धांत सुद्धा सामान्यांना गोष्टीरूपात सांगावा लागतो तसेच काहीसे. साक्षात्कारातून साकारलेली आणि मानवोपयोगी शिकवण दीर्घकाळ टिकून राहावी याकरिता प्रथा आणि परंपरा निर्माण केल्या गेल्यात, परंपरा निर्माण होण्यामागील विज्ञान हेच आहे कि, कल्याणकारी गोष्ट परंपरेच्या  स्वरूपात अधिकाधिक पिढ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. ह्याच परंपरांचा संग्रह म्हणजे आधुनिक भाषेततिल धर्माची संकल्पना गणले गेले. मानवी मन स्थिर नसल्याने पुढील काही काळात त्या परंपरांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी समाविष्ट होत गेल्या. मात्र सामाजिक दृष्ट्या लाभकारी असलेल्या कित्येक सर्वसमावेशक आणि कल्याणकारी परंपरा आजही तग धरून. प्राचीन विज्ञान ग्रहण करण्या करीता गरजेची असलेली गुरुशिष्य परंपरा गेल्या ३०० वर्षांत लुप्त होत गेल्यामुळे, जमेल तसा अर्थ देऊन हे ज्ञान पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो, त्यामुळे आधुनिक तर्कसंगत पिढीद्वारे अश्या गोष्टीना भ्रामक मानून त्या हळू हळू दुर्लक्षित केल्या जाऊ लागल्यात.


तर्कसंगत बुद्धी तुमच्या बाह्य प्रगतीकरिता आणि टिकून राहण्याच्या कामात मोलाचे योगदान देते, मात्र अस्तित्वाविषयी जाणून घेण्याच्या प्रयत्नात तर्क अपुरा पडतो. एबीओजेनेसिस ह्या पृथीवरील जीवनाच्या उगमाचा शोध घेणाऱ्या विज्ञानाच्या शाखेमध्ये जीवनाचे उगम स्थान शोधताना सगळे तर्क अपुरे पडून निव्वळ एक जादुई योगायोग म्हणून पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात मानवी लागते. कृष्ण विवर, डार्क energy डार्क मॅटर, ऑबसर्वर पॅराडॉक्स, quantum एंटॅगलमेंट सारख्या आधुनिक विज्ञानाला सतावणाऱ्या अनेक प्रश्नांपुढे तर्कबुद्धी गुढगे टेकते. कारण सर्वत्र प्रस्थापित भौतिक नियम येथे लागू होत नाहीत. मग तर्क विसंगती म्हणजे अज्ञान असे म्हणून ह्या किचकट गणितांना सोडून द्यावे काय? अगदी जसे काही आत्मज्ञानावर आधारित आणि कल्याणकारी परंपरांना अज्ञानी म्हणून हिणवत सोडून दिले गेले? नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आज उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या आधाराव सापडत नसेल तर कदाचित पुढे ज्ञान संवर्धन झाल्यास सापडू शकेल, उदाहरणादाखल. भारतीय संस्कृतीमध्ये ठरावीक वेळेनंतर संपूर्ण उपवास करण्याची प्रथा सामील आहे. हि प्रथा कुणी आणि का सुरु केली असावी याचा काही पुरावा नाही, मात्र कुठेतरी लाभकारी असल्यामुळे ती अजूनही तग धरून आहे. आधुनिक या नावाचे बिरुद मिरवणाऱ्या काहींनी कित्त्येक वर्षे उपवासाची खिल्ली उडवली मात्र एक आधुनिक जपानी cell biologist Yoshinori Ohsumi यांनी २०१६ सालचे नोबेल पारितोषिक उपवास का करावा हे सांगूनच जिंकले. या संदर्भात Intermediate  fasting च्या नावाने बरीचशी माहिती आज इंटरनेट वर उपलब्ध आहे आपण स्वतः च या संदर्भात माहिती मिळवावी आणि संपूर्ण शोध निबंध आणि भारतीय संस्कृतीचा भाग असलेला उपवास या दोन्हींचा 

 अभ्यास करून यांच्यात काही साधर्म्य आहे काय पडताळून पाहावे. एक ना अनेक गोष्टी ज्या आज तुमच्या ज्ञानानुसार कोणत्याही तार्किक चौकटीत बसूशकणार नाहीत मात्र कल्याणकारी आहे, या संस्कृतीने जपलेल्या आहेत, मात्र याची जाणीव होण्याकरिता 

कोणीतरी पाश्चिमात्याने ती तुम्हाला सांगावी लागेल. कारण भारतीय संस्कृती कशी तर्क विसंगत आहे याचा साचेबंद गेल्या दोनशे वर्षांत आपल्या बुद्धीवर साचलेला आहे. मात्र एकी गोष्ट ध्यानी असुदे, कोणतीही गोष्ट 

अभ्यासल्या शिवाय त्याविषयी मत बनवणे हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, आधुनिक संस्कृती असो किंवा प्राचीन संस्कृती असो अंधश्रद्धेला भारतीय भूमीवर थारा नाही. पुढील लेखात आपण अश्याच काही निवडक संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत.

Wednesday, 4 August 2021

प्रत्येक क्षण महत्वाचा.

चुकांमधून शिकता येते हि गोष्ट कळायला लागली कि बऱ्याचदा आयुष्य सोपे वाटू लागते. कधीकधी लहान 

गोष्टीसुद्धा  मोठा बोध देऊन जातात. जसे बुद्धिबळाचा खेळ, बुद्धिबळाच्या खेळातून शिकण्यासारख्या तश्या असंख्य गोष्टी आहेत. एक सामना गमावल्यानंतर अशीच एक शिकवण माझ्याही पदरी पडली.

मी निष्णात खेळाडू नाही, मात्र कधी कधी बुद्धिबळ खेळणे मला आवडते. एके सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने खेळत असताना खेळ रंगात आला अन चाल प्रतिचाल करीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी मी आणि माझा प्रतिस्पर्धी एकाग्र होऊन खेळू लागलो. खेळाला वेळेची मर्यादा असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निर्णय घेऊन उपलब्ध सोंगट्यांची उपयुक्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यामुळे बुद्धिबळातील बुलेट प्रकारच्या खेळात फक्त एका मिनिटाच्या वेळेत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना एक वेगळाच थरार प्राप्त होतो. प्रयत्न करून हि हा सामना मी ०.००.१ मिनिटे म्हणजेच एका सेकंदाच्या सहाव्या भागाच्या फरकाने गमावला.

 सामना संपल्यावर विचारचक्र सुरू झाले. अनेक प्रसंगात आपल्याजवळ खूप वेळ असूनदेखील योग्य  नियोजन करायला आपण फार वेळ लावतो तसेच जिथे लवकर निर्णय घेता येतील अश्या प्रसंगातही गरज नसताना आपण 

खूप विचार करत बसतो. वेळ मात्र सतत निसटून जात असतो...

प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखून त्याचे नियोजन आणि लवकर अचूक निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याला जिंकावत असते, आयुष्यातही. कौशल्य असूनदेखील वेळेचे महत्व न ओळखल्यास आणि निर्णय घेण्यास दिरंगाई करीत बसल्यास काही उपयोग होत नाही. जसे वर नमूद केलेल्या खेळात माझ्या प्रतिस्पर्ध्याने फक्त काही मिलिसेकंद कमी घेतलेत आणि तो जिंकू शकला. प्रत्येक क्षण महत्वाचा असून त्याचे महत्व मात्र आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही आणि हाच अजाणतेपणा वेळेचा सदुपयोग करण्याच्या कामातील सर्वात मोठा अडसर ठरतो. 

वेळेचे महत्व वेळीच ओळखावे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

चुकांमधून शिकता येते हि गोष्ट कळायला लागली कि बऱ्याचदा आयुष्य सोपे वाटू लागते. कधीकधी लहान 

गोष्टीसुद्धा  मोठा बोध देऊन जातात. जसे बुद्धिबळाचा खेळ, बुद्धिबळाच्या खेळातून शिकण्यासारख्या तश्या असंख्य गोष्टी आहेत. एक सामना गमावल्यानंतर अशीच एक शिकवण माझ्याही पदरी पडली.

मी निष्णात खेळाडू नाही, मात्र कधी कधी बुद्धिबळ खेळणे मला आवडते. एके सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने खेळत असताना खेळ रंगात आला अन चाल प्रतिचाल करीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी मी आणि माझा प्रतिस्पर्धी एकाग्र होऊन खेळू लागलो. खेळाला वेळेची मर्यादा असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निर्णय घेऊन उपलब्ध सोंगट्यांची उपयुक्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यामुळे बुद्धिबळातील बुलेट प्रकारच्या खेळात फक्त एका मिनिटाच्या वेळेत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना एक वेगळाच थरार प्राप्त होतो. प्रयत्न करून हि हा सामना मी ०.००.१ मिनिटे म्हणजेच एका सेकंदाच्या सहाव्या भागाच्या फरकाने गमावला.

 सामना संपल्यावर विचारचक्र सुरू झाले. अनेक प्रसंगात आपल्याजवळ खूप वेळ असूनदेखील योग्य  नियोजन करायला आपण फार वेळ लावतो तसेच जिथे लवकर निर्णय घेता येतील अश्या प्रसंगातही गरज नसताना आपण 

खूप विचार करत बसतो. वेळ मात्र सतत निसटून जात असतो...

प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखून त्याचे नियोजन आणि लवकर अचूक निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याला जिंकावत असते, आयुष्यातही. कौशल्य असूनदेखील वेळेचे महत्व न ओळखल्यास आणि निर्णय घेण्यास दिरंगाई करीत बसल्यास काही उपयोग होत नाही. जसे वर नमूद केलेल्या खेळात माझ्या प्रतिस्पर्ध्याने फक्त काही मिलिसेकंद कमी घेतलेत आणि तो जिंकू शकला. प्रत्येक क्षण महत्वाचा असून त्याचे महत्व मात्र आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही आणि हाच अजाणतेपणा वेळेचा सदुपयोग करण्याच्या कामातील सर्वात मोठा अडसर ठरतो. 

वेळेचे महत्व वेळीच ओळखावे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

Wednesday, 28 July 2021

अनंतातून शुन्याकडे: भाग ३ : सृष्टीशी एकरूपता

 


पर्यावरण किंवा निसर्ग हा आपल्या पासून वेगळा आहे असे समजण्याची चूक आपण करतो आणि मानवाकडून होणार निसर्गाचा ऱ्हास कसा कमी करता येईल याविषयी कल्पना करू लागतो.
हे संबंध विश्व एकच निसर्ग असून अस्तित्वात असलेली प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्ट एकमेकांना प्रभावित करीत निसर्गाची लय टिकवून ठेवीत असते. मग सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधील गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने प्राप्त झालेली स्थिरता असो किंवा एखाद्या मधमाशीकडून अजाणतेपणे होणारे हजारो परागकणांचे रोपण ज्यातून आजवर लक्षावधी वृक्षांची जंगले उभी राहिलीत.

माणूस या सर्व नैसर्गिक व्यवस्थे मध्ये कोणत्यातरी कोपऱ्यातील एक घटक आहे. नैसर्गिक व्यवस्थेला चालवणाऱ्या साखळी मध्ये आपण सर्वोच्च स्थानी नसून, फक्त चैतन्य प्राप्तीच्या बाबतीत सुदैवी ठरलो. इतर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी तुलना करता मानवाला होणार चेतनेचा बोध सर्वोच्च आहे. त्या अर्थी, मानवाने समस्थ सृष्टीच्या संचलनात मोलाचे योगदान देऊन प्रस्थापित निसर्ग व्यवस्था वृद्धिंगत करणे अपेक्षित आहे.
प्राप्त बुद्धीमुळे स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची घोडचूक आपण करीत आहोत आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या निसर्गाला आपल्यापासून वेगळे समजून केवळ आणि केवळ आपल्या षड्रिपूंवर आधारित गरजा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी निसर्गरूपी वृक्षाच्या मुळावर घाव घालीत असून ह्याच वटवृक्षावर आपले देखील घरटे आहे हे आपण पुरते विसरत चाललेलो आहोत.

पुराणकाळात उदयाला आलेल्या कोणत्याही संस्कृतीची बीजे निसर्गावर असलेले मानवाचे अवलंबित्व ओळखून निसर्गाचा आदर करण्यात सापडतात. मात्र गेल्या काही शतकांमध्ये अचानक उदयाला आलेली आधुनिक संस्कृती निसर्गापासून तुटत चालली असून केवळ अज्ञानामुळे आपण निसर्गाच्या शक्तीला दुर्लक्षित करत आहोत. अद्ययावत उपकरणे म्हणजेच मानवजातीचा आधार असे काहीसे मत तरुणांमध्ये तयार होताना दिसून येते. मात्र मानवासारखे उत्कृष्ट उपकरण बनवणाऱ्या निसर्गाच्या किमयेला दुर्लक्षित करून कसे चालेल.
अगदी अणुच्या घडणी पासून ते मानवीय चेतनेचा विकास करण्यापर्यंत निसर्गाने सूक्ष्म गोष्टींमध्ये देखील गफलत केलेली नाहीये. जैविकअभियांत्रिकीचा महासंचालक निसर्ग आपण रोजच्या व्यवहारात ध्यानात सुद्धा घेत नाही हे नवलंच. शे दोनशे वर्षांपूर्वी पर्यंत मात्र भारतीय आणि इतर काही संस्कृतीतील लोक निसर्ग शक्तींच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत दिवसाची सुरुवात आणि शेवट करत असत. आणि आज हा आदरभाव व्यक्त करणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण असे समजणारा अतिहुशार समाज अस्तित्वात येताना दिसतोय.
विश्वोत्पत्ती आणि उत्क्रांतीच्या महायज्ञातून निघालेला एक सूक्ष्म घटक म्हणजे मानव. मानवाचे अस्तित्व टिकून राहण्या करीत साहाय्य करणारे अब्जावधी इतर सजीव आणि निर्जीव घटक आपल्या नकळत मात्र अविरतपणे कार्य करीत आहेत, आणि जो पर्यंत त्यांच्या कार्यात काही अडथळा येत नाही तो पर्यंत याची जाणीवदेखील आपल्याला होत नसते.
मागील सत्रात पहिल्या प्रमाणे आपल्याला मोफत मिळणारा प्राणवायू लक्षावधी वर्षांपूर्वी एकदिवसाचे आयुष्य जगून सायनो बॅक्टरीया ह्या एकपेशीय जिवाने वातावरणात आणून आपल्याला देणगी दिली. पृथ्वीच्या शिलावरणातील खनिजे आणि मूलद्रव्ये खेचून घेऊन तुम्हाला प्राप्त असलेले सुदृढ आणि सुडौल शरीर बनवण्याकरिता हजारो वनस्पती आपले जीवन व्यतीत करीत आहेत. आपण ज्या दिशेला पाहू त्यादिशेला आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत तत्वे आणि घटना सापडतील, ज्यांचा रचयिता सर्वशक्तिमान निसर्ग शिवाय दुसरा कुणी नाही.
प्रदूषण कमी करावे, झाडे लावा, पाणी वाचवा यानं सारख्या घोषणा देऊन काही निद्रितावस्थेतील लोकांना जागृत करण्याची मुळात गरजच का भासावी अज्ञानाने शिखर का गाठावे?
सर्वोच्च बुद्धिमत्ता लाभलेल्या मानवाला स्वतः ची मूलभूत गरज कोणती याची स्वतंत्र्य जाणीव का करून द्यावी लागावी? याचे उत्तर एकाच, आधुनिकीकरणाच्या नावाखाली तयार झालेली ज्ञानी असल्याचा आभास घडवणारी अज्ञानी वृत्तीची होत असलेली जोपासना. ज्या वृत्तीचे मूळ कारण भोगीवादाचा काही अंशी केलेला स्वीकार होय. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास भोगीवाद म्हणजे पंचेंद्रियांच्या तृप्तीची सतत वाढ करीत राहणे होय.
येथे आधुनिकीकरणाला किंवा तांत्रिक प्रगतीला विरोध नाहीये, मात्र जीवन अधिकाधिक आरामदायी करण्याच्या मानसिकतेला बदलणे आवश्यक वाटते, जीवन अधिकाधिक सुव्यवस्थित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत असणे मानवासाठी सुखकर आणि काही वेळेस गरजेचे सुद्धा आहे यात कोणतीही शंका नाही. मात्र हे सर्व निसर्गाचा ऱ्हास करून प्राप्त करावे हे मात्र स्वतः च्या विरोधात एक दीर्घ कारस्थान करण्यासारखेच म्हणावे लागेल. ज्याचे परिणाम कालांतराने दिसू लागतील किंबहुना जगातील मुख्य शहरांतील खालावलेली भूजल पातळी आणि महासागराची वाढणारी पाण्याची पातळी याचे प्रमाण देऊ लागली आहे. आपण कोठे जात आहोत याची जाणीव आपल्याला झालेली आहे आणि आंतरराष्टीय स्थरावर हा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रयत्न झालेले हि दिसून येतात. मात्र सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था वेळेत यशस्वी होणे अवघडच. अर्थव्यवस्थेने प्रभावित किंवा ग्रसित आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवणे इतके सोपे नसून, या संस्थांचा वातावरणातील कार्बन नियंत्रित करण्याचा प्रयत्न निव्वळ गोगलगाय असून त्यामुळे वातावरणीय बदलाच्या वादळी वेगाला थोपवणे महाकठीण. या कामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानि केलेले प्रयत्न अपुरेच राहतील, कायम, जो पर्यंत तुमचा सक्रिय सहभाग यात नाही. सक्रिय सहभाग न होण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाशी आपले तुटत चाललेले नाते. सर्वप्रथम निसर्गाशी पुन्हा नाते जोडणे आवश्यक आहे. किमान १० पैकी ८ जणांना खरीखुरी जाणीव व्हावी लागेल कि शुद्ध हवा हि वायफाय पेक्षा जास्त महत्वाची आहे तसेच आपले आरोग्य, आर्थिक प्रगती, सामाजिक शांतता ह्या सर्व गोष्टी निसर्गाशी घट्ट जोडलेल्या आहेत याचे भान यावे लागेल. घरात गरज नसताना विद्युत उपकरणे बंद केल्याने जागतिक हवामान बदलला कमी करण्यासाठी आपलाही सूक्ष्म हातभार लागणार आहे याची जाणीव व्हावी लागेल.
एखादे झाड लावून त्याची जोपासना केल्यास आपल्या मुलांसाठी लक्षावधी टन प्राणवायू देणारे नैसर्गिक यंत्रच आपण उभारत आहोत अशी कर्तव्य पूर्तीची भावना मनात यावी लागेल. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या कारच्या इजिनची दुरुस्ती केल्याने, किंवा कमीत कमी इंधनाचा वापर केल्याने, किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास अथवा विद्युत वाहनाला प्राधान्य दिल्यास आपण पृथ्वीच्या वातावरणात फार मोठा सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारी उचलली आहे हे नक्की. दैनंदिन जीवनात शेकडो गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने करून देखील आपण निसर्गाला अबाधित ठेवून स्वतः साठी आणि आपल्या मुलांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि जगण्यायोग्या पृथ्वी बहाल करू शकतो. आपली पिढी ला मिळालेली संधी कदाचीत पुढील पिढ्यांना मिळणार नाही. हवामान बदलाचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आणखीन काही वर्षानंतर तो रोखणे किंवा कमी करणे मानवाच्या हाताबाहेरील असेल यात शंका नाही. भरधाव वेगाने जाणारे वाहन वेळीच रोखणे सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे मात्र नियंत्रण सुटल्यावर कितीही इच्छा असून उपयोग नाही.
इच्छा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे अजून तुमचे दैनंदिन कार्य वातावरणीय बदलामुळे म्हणावे तितके बाधित झालेले नाही म्हणून ही समस्या भविष्यातील समस्या असून माझे काही यात नुकसान नाही अशी विचित्र आणि स्वार्थी मानसिकता सर्वात बुध्दिमान मानवप्राणी जोपासत चाललाय. काही मायक्रो ग्राम चा मेदू लाभलेली एक लहानशी मुंगी देखील भविष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी वर्षभर आधी पासूनच प्रयत्न करते आणि  पर्जन्य काळात स्वतःला आणि आपल्या समाजाला सुखरूप ठेवते. निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या मानवाने भविष्यातील समस्यांना वेळीच थोपविण्यासाठी काय करावे हे वेगळे सांगण्याची खरच गरज आहे काय?

Tuesday, 27 July 2021

The life can only be experienced in the present moment that is going on. Quote #TM387

सुविचार ३८७

*जीवनाचा आस्वाद फक्त चालु असलेल्या एकमेव वर्तमान क्षणातच अनुभवता येतो*.

आत्ताचा क्षण हाच खऱ्या अर्थाने जीवनाची प्रचिती देणारा असतो. बाकी सर्व मानसिक कल्पना आहेत. आत्ताचा क्षण आपण कसा व्यतीत करीत आहोत यावर आपला जीवनाचा अनुभव अवलंबून आहे. मात्र बऱ्याचदा वर्तमान क्षणाला सोडून आपले मन इतरत्र भरकटत राहते आणि जीवनाच्या मूलभूत अनुभवाशी जोडलेल्या दुव्याला स्पर्श करायचा राहूनच जातो.

Quote #TM387

 *The life can only be experienced in the present moment that is going on*.

 The present moment is when life is happening in the true sense. The rest of everything is imaginary.  Our life experience depends on how we try to live in the present moment. Most of the time, our mind wanders away from the present moment and it misses touching the link connected with the fundamental experience of life.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...