Wednesday 28 July 2021

अनंतातून शुन्याकडे: भाग ३ : सृष्टीशी एकरूपता

 


पर्यावरण किंवा निसर्ग हा आपल्या पासून वेगळा आहे असे समजण्याची चूक आपण करतो आणि मानवाकडून होणार निसर्गाचा ऱ्हास कसा कमी करता येईल याविषयी कल्पना करू लागतो.
हे संबंध विश्व एकच निसर्ग असून अस्तित्वात असलेली प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्ट एकमेकांना प्रभावित करीत निसर्गाची लय टिकवून ठेवीत असते. मग सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधील गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने प्राप्त झालेली स्थिरता असो किंवा एखाद्या मधमाशीकडून अजाणतेपणे होणारे हजारो परागकणांचे रोपण ज्यातून आजवर लक्षावधी वृक्षांची जंगले उभी राहिलीत.

माणूस या सर्व नैसर्गिक व्यवस्थे मध्ये कोणत्यातरी कोपऱ्यातील एक घटक आहे. नैसर्गिक व्यवस्थेला चालवणाऱ्या साखळी मध्ये आपण सर्वोच्च स्थानी नसून, फक्त चैतन्य प्राप्तीच्या बाबतीत सुदैवी ठरलो. इतर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी तुलना करता मानवाला होणार चेतनेचा बोध सर्वोच्च आहे. त्या अर्थी, मानवाने समस्थ सृष्टीच्या संचलनात मोलाचे योगदान देऊन प्रस्थापित निसर्ग व्यवस्था वृद्धिंगत करणे अपेक्षित आहे.
प्राप्त बुद्धीमुळे स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची घोडचूक आपण करीत आहोत आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या निसर्गाला आपल्यापासून वेगळे समजून केवळ आणि केवळ आपल्या षड्रिपूंवर आधारित गरजा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी निसर्गरूपी वृक्षाच्या मुळावर घाव घालीत असून ह्याच वटवृक्षावर आपले देखील घरटे आहे हे आपण पुरते विसरत चाललेलो आहोत.

पुराणकाळात उदयाला आलेल्या कोणत्याही संस्कृतीची बीजे निसर्गावर असलेले मानवाचे अवलंबित्व ओळखून निसर्गाचा आदर करण्यात सापडतात. मात्र गेल्या काही शतकांमध्ये अचानक उदयाला आलेली आधुनिक संस्कृती निसर्गापासून तुटत चालली असून केवळ अज्ञानामुळे आपण निसर्गाच्या शक्तीला दुर्लक्षित करत आहोत. अद्ययावत उपकरणे म्हणजेच मानवजातीचा आधार असे काहीसे मत तरुणांमध्ये तयार होताना दिसून येते. मात्र मानवासारखे उत्कृष्ट उपकरण बनवणाऱ्या निसर्गाच्या किमयेला दुर्लक्षित करून कसे चालेल.
अगदी अणुच्या घडणी पासून ते मानवीय चेतनेचा विकास करण्यापर्यंत निसर्गाने सूक्ष्म गोष्टींमध्ये देखील गफलत केलेली नाहीये. जैविकअभियांत्रिकीचा महासंचालक निसर्ग आपण रोजच्या व्यवहारात ध्यानात सुद्धा घेत नाही हे नवलंच. शे दोनशे वर्षांपूर्वी पर्यंत मात्र भारतीय आणि इतर काही संस्कृतीतील लोक निसर्ग शक्तींच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत दिवसाची सुरुवात आणि शेवट करत असत. आणि आज हा आदरभाव व्यक्त करणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण असे समजणारा अतिहुशार समाज अस्तित्वात येताना दिसतोय.
विश्वोत्पत्ती आणि उत्क्रांतीच्या महायज्ञातून निघालेला एक सूक्ष्म घटक म्हणजे मानव. मानवाचे अस्तित्व टिकून राहण्या करीत साहाय्य करणारे अब्जावधी इतर सजीव आणि निर्जीव घटक आपल्या नकळत मात्र अविरतपणे कार्य करीत आहेत, आणि जो पर्यंत त्यांच्या कार्यात काही अडथळा येत नाही तो पर्यंत याची जाणीवदेखील आपल्याला होत नसते.
मागील सत्रात पहिल्या प्रमाणे आपल्याला मोफत मिळणारा प्राणवायू लक्षावधी वर्षांपूर्वी एकदिवसाचे आयुष्य जगून सायनो बॅक्टरीया ह्या एकपेशीय जिवाने वातावरणात आणून आपल्याला देणगी दिली. पृथ्वीच्या शिलावरणातील खनिजे आणि मूलद्रव्ये खेचून घेऊन तुम्हाला प्राप्त असलेले सुदृढ आणि सुडौल शरीर बनवण्याकरिता हजारो वनस्पती आपले जीवन व्यतीत करीत आहेत. आपण ज्या दिशेला पाहू त्यादिशेला आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत तत्वे आणि घटना सापडतील, ज्यांचा रचयिता सर्वशक्तिमान निसर्ग शिवाय दुसरा कुणी नाही.
प्रदूषण कमी करावे, झाडे लावा, पाणी वाचवा यानं सारख्या घोषणा देऊन काही निद्रितावस्थेतील लोकांना जागृत करण्याची मुळात गरजच का भासावी अज्ञानाने शिखर का गाठावे?
सर्वोच्च बुद्धिमत्ता लाभलेल्या मानवाला स्वतः ची मूलभूत गरज कोणती याची स्वतंत्र्य जाणीव का करून द्यावी लागावी? याचे उत्तर एकाच, आधुनिकीकरणाच्या नावाखाली तयार झालेली ज्ञानी असल्याचा आभास घडवणारी अज्ञानी वृत्तीची होत असलेली जोपासना. ज्या वृत्तीचे मूळ कारण भोगीवादाचा काही अंशी केलेला स्वीकार होय. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास भोगीवाद म्हणजे पंचेंद्रियांच्या तृप्तीची सतत वाढ करीत राहणे होय.
येथे आधुनिकीकरणाला किंवा तांत्रिक प्रगतीला विरोध नाहीये, मात्र जीवन अधिकाधिक आरामदायी करण्याच्या मानसिकतेला बदलणे आवश्यक वाटते, जीवन अधिकाधिक सुव्यवस्थित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत असणे मानवासाठी सुखकर आणि काही वेळेस गरजेचे सुद्धा आहे यात कोणतीही शंका नाही. मात्र हे सर्व निसर्गाचा ऱ्हास करून प्राप्त करावे हे मात्र स्वतः च्या विरोधात एक दीर्घ कारस्थान करण्यासारखेच म्हणावे लागेल. ज्याचे परिणाम कालांतराने दिसू लागतील किंबहुना जगातील मुख्य शहरांतील खालावलेली भूजल पातळी आणि महासागराची वाढणारी पाण्याची पातळी याचे प्रमाण देऊ लागली आहे. आपण कोठे जात आहोत याची जाणीव आपल्याला झालेली आहे आणि आंतरराष्टीय स्थरावर हा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रयत्न झालेले हि दिसून येतात. मात्र सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था वेळेत यशस्वी होणे अवघडच. अर्थव्यवस्थेने प्रभावित किंवा ग्रसित आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवणे इतके सोपे नसून, या संस्थांचा वातावरणातील कार्बन नियंत्रित करण्याचा प्रयत्न निव्वळ गोगलगाय असून त्यामुळे वातावरणीय बदलाच्या वादळी वेगाला थोपवणे महाकठीण. या कामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानि केलेले प्रयत्न अपुरेच राहतील, कायम, जो पर्यंत तुमचा सक्रिय सहभाग यात नाही. सक्रिय सहभाग न होण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाशी आपले तुटत चाललेले नाते. सर्वप्रथम निसर्गाशी पुन्हा नाते जोडणे आवश्यक आहे. किमान १० पैकी ८ जणांना खरीखुरी जाणीव व्हावी लागेल कि शुद्ध हवा हि वायफाय पेक्षा जास्त महत्वाची आहे तसेच आपले आरोग्य, आर्थिक प्रगती, सामाजिक शांतता ह्या सर्व गोष्टी निसर्गाशी घट्ट जोडलेल्या आहेत याचे भान यावे लागेल. घरात गरज नसताना विद्युत उपकरणे बंद केल्याने जागतिक हवामान बदलला कमी करण्यासाठी आपलाही सूक्ष्म हातभार लागणार आहे याची जाणीव व्हावी लागेल.
एखादे झाड लावून त्याची जोपासना केल्यास आपल्या मुलांसाठी लक्षावधी टन प्राणवायू देणारे नैसर्गिक यंत्रच आपण उभारत आहोत अशी कर्तव्य पूर्तीची भावना मनात यावी लागेल. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या कारच्या इजिनची दुरुस्ती केल्याने, किंवा कमीत कमी इंधनाचा वापर केल्याने, किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास अथवा विद्युत वाहनाला प्राधान्य दिल्यास आपण पृथ्वीच्या वातावरणात फार मोठा सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारी उचलली आहे हे नक्की. दैनंदिन जीवनात शेकडो गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने करून देखील आपण निसर्गाला अबाधित ठेवून स्वतः साठी आणि आपल्या मुलांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि जगण्यायोग्या पृथ्वी बहाल करू शकतो. आपली पिढी ला मिळालेली संधी कदाचीत पुढील पिढ्यांना मिळणार नाही. हवामान बदलाचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आणखीन काही वर्षानंतर तो रोखणे किंवा कमी करणे मानवाच्या हाताबाहेरील असेल यात शंका नाही. भरधाव वेगाने जाणारे वाहन वेळीच रोखणे सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे मात्र नियंत्रण सुटल्यावर कितीही इच्छा असून उपयोग नाही.
इच्छा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे अजून तुमचे दैनंदिन कार्य वातावरणीय बदलामुळे म्हणावे तितके बाधित झालेले नाही म्हणून ही समस्या भविष्यातील समस्या असून माझे काही यात नुकसान नाही अशी विचित्र आणि स्वार्थी मानसिकता सर्वात बुध्दिमान मानवप्राणी जोपासत चाललाय. काही मायक्रो ग्राम चा मेदू लाभलेली एक लहानशी मुंगी देखील भविष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी वर्षभर आधी पासूनच प्रयत्न करते आणि  पर्जन्य काळात स्वतःला आणि आपल्या समाजाला सुखरूप ठेवते. निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या मानवाने भविष्यातील समस्यांना वेळीच थोपविण्यासाठी काय करावे हे वेगळे सांगण्याची खरच गरज आहे काय?

Tuesday 27 July 2021

The life can only be experienced in the present moment that is going on. Quote #TM387

सुविचार ३८७

*जीवनाचा आस्वाद फक्त चालु असलेल्या एकमेव वर्तमान क्षणातच अनुभवता येतो*.

आत्ताचा क्षण हाच खऱ्या अर्थाने जीवनाची प्रचिती देणारा असतो. बाकी सर्व मानसिक कल्पना आहेत. आत्ताचा क्षण आपण कसा व्यतीत करीत आहोत यावर आपला जीवनाचा अनुभव अवलंबून आहे. मात्र बऱ्याचदा वर्तमान क्षणाला सोडून आपले मन इतरत्र भरकटत राहते आणि जीवनाच्या मूलभूत अनुभवाशी जोडलेल्या दुव्याला स्पर्श करायचा राहूनच जातो.

Quote #TM387

 *The life can only be experienced in the present moment that is going on*.

 The present moment is when life is happening in the true sense. The rest of everything is imaginary.  Our life experience depends on how we try to live in the present moment. Most of the time, our mind wanders away from the present moment and it misses touching the link connected with the fundamental experience of life.

Saturday 10 July 2021

There is no other way to excel without absolute involvement. Quote #TM386

Quote #TM386

*There is no other way to excel without absolute involvement*.

We always want to learn many things but sometimes we find learning difficult becausse of low intensity and interest.
Gaining mastery over anything requires absolute attention that derives from involvement.

सुविचार ३८६

*कार्यात पूर्णपणे वाहून घेतल्या शिवाय उत्कृष्ट कार्य होऊ शकत नाही*

 अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आहेत पण कधीकधी आपल्याला ईच्छा असून देखील शिकणे कठीण वाटते. याचा अर्थ शिकण्याचे तीव्रता आणि रुची चा अभाव. खेळामध्ये पूर्णपणे रुची नसल्यास, त्यात सामील होणे आणि आपले उत्कृष्ट योगदान देणे कठीण आहे.

जिवंत तुरुंग.



वरील चित्र लहानां पासून मोठ्यानं पर्यंत कुणालाही दाखवून यांतील सद्गृहस्थ किंवा Gentlemen  कोण असे विचारल्यास? नक्कीच अधिकाधिक लोक, डावीकडील चित्रावर बोट ठेवतील.
यांतील डावीकडील व्यक्ती युरोप मधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून उजवीकडील व्यक्ती म्हणजे २०२१ साली  पद्मश्री पुरस्कार विजेती.

असे का? याचे उत्तर अगदी एका ओळीत देऊन तुम्हाला पटण्यासारखे नसेल कारण वरील चित्रातील उदाहरणाप्रमाणेच आपली बुद्धी हॅक झालेली आहे.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात बव्हंशी लोक सांगतील जगाच्या पाठीवर जर राहण्या योग्य राष्ट्र कोणते असेल तर ते पाश्चिमात्य स्थित. मग भारत राहण्यासाठी योग्य राष्ट्र का नाही?

आज जगात भारताची जी छाप आहे तीच आपल्या मनावरही बिंबित आहे.

भारत म्हंटले कि भ्रष्टचारी, महिलांसाठी असुरक्षित, घाणीचे वास, अवैज्ञानिक श्रद्धा, गरिबी अशी अनेक चित्रे मनासमोर तरळू लागतात. सोन्याचा धूर निघणाऱ्या राष्ट्राची प्रतिमा आज अगदी तळागाळात पाहायला मिळते.

१. गौरवशाली इतिहास

जगात क्वचितच एखादे राष्ट्र असावे ज्याला हजारो वर्षांचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास लाभलेला असावा, आज जे देश विकसित आहेत त्यांनादेखील इतका प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभलेला नाही. मात्र जो काही इतिहास त्यांना लाभला आहे त्यातील अभिमान करण्यासारख्या गोष्टी त्यांनी वारंवार जगजाहीर केल्यात, आणि नागरिकांनमध्ये  अस्मितेची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला.

भारताचा मात्र फक्त लुटमारीचा इतिहास सर्वज्ञात आणि सर्वजाहीर आहे, जणू गेल्या ७०० वर्षांव्यतिरिक्त भारतात काही घडलेच नसावे असे वाटू लागते, पुन्हा पुन्हा ठेचा लागूनयेत म्हणून हा इतिहास माहित असणे हि महत्वाचे  आहे. मात्र हा इतिहास म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचा फक्त पृष्ठभाग आहे, खोलवर पाहिल्यास भारताचा ऐतिहासिक ठेवा हा जगासाठी खजिनाच आहे.

आम्ही मात्र संस्कृतीच्या खोलीकडे पाठफिरवायची असे ठरवलेले दिसते. मुख्यत्वे गेल्या दोनशे वर्षातच डुबक्या मारायच्या, मनमुराद. शालेय जीवनात आपण ज्या गोष्टी शिकतो तीच आपली मुख्य विचारधारा बनते. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये काही मोजके गौरवशाली क्षण काही ओळींमध्ये पूर्ण केले जातात आणि लूटमार मात्र रंगीत चित्रांसहित मनावर बिंबवली जाते. जर लहान वयातच भारताचा इतिहासाचा खजिना नाही समजला तर तरुणांकडून भारतासाठी अभिमान बाळगण्याची वार्ता करू नये. कोणताही तरुण भारता बाहेर राहणेच पसंत करेल. राष्ट्रभक्तीची सुरुवात इतिहासातून होते, छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊंनी जर ऐतिहासिक गौरव ऐकवला नसता तर कदाचित आपला इतिहास वेगळा असता. विवेकानंद भारतीय तत्त्वज्ञानाच्या गर्त्यात मनसोक्त पोहले नसते तर खऱ्या अध्यात्माची ओळख जगापासून दूरच राहिली असती,डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण भारताच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणी गेले नसते तर भारताने गौरव करावा असे राष्ट्रपती कसे लाभले असते? बालपणीच राष्ट्राच्या उभारणीची ठिणगी पडल्यास भविष्य उज्वलच आहेत यात शंका नाही, याची प्रथम पायरी म्हणजेच गौरवशाली इतिहास शिकवण्यावर भर असावा. आज टाय घालून मिरवणाऱ्यांना जेव्हा अंगावर कपडे घालणे हि माहित नव्हते, त्या काळी भारतीय इतिहासात अवकाशाचा वेध घेणारे ग्रंथ श्लोकबद्ध केले जात होते. भारतीयांशी व्यापार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कित्येक पिढ्या पश्चिमेत जन्मल्या, आणि त्यांना भारत म्हणजे एक कल्पना विश्वातील राष्ट्र का वाटायचा, हे शिकवा. भारतातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची फक्त लूटमार करून हि अनेक शहरे इतिहासाच्या नकाश्यावर अस्तित्वात आलीत, यावरून समृद्धीची झलकभर पाहायला मिळते. पृथीच्या परिवलनाविषयी सांगणाऱ्या आधुनिक विद्वानांच्याही जवळपास १००० वर्षे आधी इथल्याच मातीत आर्यभटाने त्याच गोष्टी सूत्रबद्ध केलेल्या आहेत. शांततेचा संदेश देणारे आणि मानवीय जाणिवांच्या पलीकडील अभ्यास करणारे महान इथेच जन्मले, पूर्वोत्तर भारतातील इंग्रजांना देखील न जिंकता आलेल्या आहोमांचा अजिंक्य इतिहास शालेय पुस्तकातून निसटून गेला आहे त्याला पुन्हा रचना बद्ध केला जावा. जर तुम्ही गौरवशाली इतिहास सांगितला नाही तर तरुण पिढी हि गौरवशाली भविष्यासाठी झटणार नाही हे ध्यानी राहूदे. त्यांच्या साठी पाश्चिमात्य संस्कारच आदर्श असतील.


२. जगाचे अर्थकारण:

यशस्वी जीवन असे म्हणताच सर्वप्रथम डोळ्यांसमोर एक मोठे घर, आलिशान गाडी, पुष्कळ पैसे हे सहज तरळून जाते. यशाची हि व्याख्या आपल्या डोक्यात कुणी आणली? तरुणांमध्ये देशप्रेमाची ठिणगी पाडणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यशस्वी नव्हते काय? अब्दुल कलाम यांचे यश म्हणजे नेमके काय? हजारोंच्या जीवनाला स्पर्श करणारून जीवनाच्या आत्मिक प्रगतीचा मार्ग सांगणारे बुद्ध आणि वर्धमान महावीर,गुरु गोविंद सिंग यांचे यश कोणत्या प्रकारचे होते? आज सीमेवर उभा असलेल्या सैनिकाचे यश आपल्या यशाच्या व्याख्येत मात्र बसत नाही.

तरीही हे सर्व कमालीचे यशस्वी आहेत. मग आपल्या मनात हा आर्थिक यशाचा डोंगर उभा राहण्यामागे एकमेव कारण म्हणजेच रीतसर चाललेली दिशाभूल. पहिले कारण म्हणजे अटीतटीच्या आर्थिक स्पर्धेत आपल्या उत्पादनांसाठी प्रथम गरज निर्माण केली जाते आणि उत्पादन खपवले जाते, हि गरज निर्मिती म्हणजेच पाथमिक दिशाभूल, ठराविक रंगच उत्कृष्ट, ठराविक शारिरीक बांधणीच उत्कृष्ट, ठराविक पेय पिणे म्हणजेच मर्दानी खेळ, काही उत्पादने जर लहान मुलांना दिली नाहीत तर बुद्धीचा विकास होणारच नाही, ऐषारामी जीवन जगणे म्हणजेच मौज. अश्या अनेक प्रतिमा लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल्या जातात आणि आर्थिक गरज निर्माण होते. 

याचा अर्थ पैसे महत्वाचे नाहीत असा नाही, पैश्यांची उपयोगिता सर्वात अधिक. मात्र तो तुमच्या आयुष्या हेतू नसावा. गाडीमध्ये पेट्रोल ज्या प्रमाणे गरजेचे आहे त्याप्रमाणे पैसे महत्वाचे आहेत. मात्र आपण पेट्रोलसाठी आपण गाडी चालवत नाही. तसेच तुमचे आयुष्याचे विविध पैलू विकसित करून स्वतः चे आणि जगाचे कल्याण करण्या साठी ह्या पैश्याचा वापर होणे सर्वात हितकारक. युद्ध साहित्य निर्मिती, औषधी उत्पादने आणि सौंदर्य प्रसाधने हे जगावर अधिराज्य गाजवणारे उद्योग जो पर्यंत अस्तित्वात आहेत तो पर्यंत ह्या सर्वांची गरज हि जगात निर्माण होतच राहणार, केली जाणार. असो- यापूर्वी भारतीयांना आत्मिक स्वातंत्र्य हेच परम यश असावे असे वाटत होते, कारण त्याचे जागतिक महत्व समजावून सांगणारा इतिहास अभ्यासात होता. वसुधैव कुटुंबकं हे तेव्हापासून उगीच कुणीतरी लिहून ठेवलेलं नाहीये. आज आपल्या मानसिकतेला भोगीवादाने इतके भ्रमित केलेलं आहे कि चंगळवाद हाच आनंदाचा मार्ग अशी दिशाभूल झालेली आहे आणि वृत्तीही जड झाल्याने बदलाभिमुख तरुणाई ची संख्या शून्य होत चाललीये. यावर उपाय म्हणजेच भारतीय ज्ञानाचा खजिना जोपासून भारताला आर्थिक महासत्ता बनवणे यासाठी आधी उद्योगी व्यक्तिमत्वाची उद्यमात सकल समृद्धी या भारतीय सुभाषितशी ओळख करून द्यावी आणि मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्पादनाच्या स्पर्धेत उतरावे. कागदांव्यतिरिक्त प्रत्यक्ष कृतीत लक्ष्य दिल्यास पुढील काळात लाखो उद्योगी घडवता येऊ शकतील.

कारण जे राष्ट्र आर्थिक रित्या बलवान जग त्यांचेच ऐकेल. आणि आत्मिक मूल्यांशिवाय शिवाय महासत्ता बनू पाहणारी राष्ट्रे जगासाठी धोकाच निर्माण करतील, कारण त्यांची भाषा सर्वसमावेशक कधीच होऊ शकत नाही, फक्त आणि फक्त कुरघोडीची वृत्तीच पाहायला मिळेल.

तरुणांना भारतात राहून आर्थिक समृद्धी साधण्याची भाषा न शिकवल्यास इतिहासाच्या अपुऱ्या ज्ञानामुळे प्रत्येकाला पश्चिमेकडील वातावरणाचा लळा लागण्याची शक्यता जास्तच राहील.


३. भ्रष्टचाराचा राक्षस

कोठून आला हा राक्षस जवळपास सर्वच व्यवस्था गिळंकृत केलेला हा महाकाय भस्मासुर टेबलाच्या पलीकडेच आहे असे समजून फक्त दोषारोप करू नयेत. यासाठी सर्वस्वी जबाबदार आपणच. मतदानापासून तो सुरु होतो. इतिहासातील मूल्य शिक्षणाचा अभाव, आर्थिक गरज जास्त त्यामुळे हांजी हांजी करून बलशाली व्यक्तीला निवडून दिल्यावर तो कान पिळणारच. याउलट फक्त आणि फक्त तुमच्या लहानश्या गावात किंवा नगरात जो व्यक्ती निस्वार्थपणे झटत  असतो त्यालाच निवडून द्यावे. आणि निवडून दिल्यावर जाब विचारायची हि सवय लावून घ्यावी. सत्तेची गणिते सहज सोपी बनतील. आधी आपल्यातला भस्मासुर काढून टाकावा म्हणजे व्यवस्थेतूनही तो निघून जाईल. व्यवस्था म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आपल्यासारखीच षडरीपूंनि ग्रस्त माणसं, भरकटलेली. भ्रष्टाचाराचा हा सुरुंग उडवून लावल्याशिवाय, भारताला उद्योगी राष्ट्र बनवणे अवघड, फक्त मूल्य शिकवून जग घडणार नाही, आर्थिक महासत्ता हि बनावे लागेल म्हणजे जगात मूल्यांचे संवर्धन करता येईल.

अश्या अनेक बाबींमध्ये लक्ष्य घालून पहिल्यांदा भारतीयांमध्ये भारताबद्दल अभिमान जागृत केला जावा, अन्यथा भावी पिढीची सद्गृहस्थाची, मूल्यांची, जीवनाची आणि भारताची व्याख्या बदलत राहील आणि भारताला एक जिवंत तुरुंग मानून, यातून सुटून जाण्यातच धन्यता मानणाऱ्या अनेक पिढ्या तयार होतील, अन त्यात वावगे काहीच नसेल.

Friday 9 July 2021

Every morning or night, allow your ego to let go of everything it holds. Quote #TM385

Quote #TM385

*Every morning or night, allow your ego to let go of everything it holds*

Every day, a few things don't happen our way and negativity takes charge of our minds.  Our ego holds such negativity like a magnet and keeps it for a long time.  Sometimes mind goes ahead and digs in the past to discovers more threads of similar negative patterns and begins to weave a web like a spider around those negative emotions, mind engrosses itself in this trap and becomes one with the ego, now the ego does not exist separate from us. We ignore the fact that all this psychological drama is produced by us, here the chain of mental catastrophes begins.
If you want to avoid this in time, at least once a day, relax all the threads connected with ego and remember your subtle existence on a cosmic scale.

सुविचार ३८५

*प्रत्येक सकाळी अथवा रात्री, आपल्या अहंकाराला त्याने धरलेली प्रत्येक गोष्ट सोडून देण्याची अनुमती द्यावी*

दिवसभरात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. त्या गोष्टींच्या बाबतीत मनात नकारात्मकता साठू लागते. आपला अहंकार अश्या गोष्टीना चुंबका सारखा पकडतो आणि पुढे खूप काळ धरून ही ठेवतो. कधी कधी तो भूतकाळातले नकारात्मकतेचे आणखीन धागे शोधून काढतो आणि त्या नकारात्मक भावने भोवती कोळ्या सारखे जाळे विणायला लागतो. बघता बघता आपण त्यात इतके गुरफटत जातो की अहंकारचे आपल्यापेक्षा वेगळे अस्तित्वच राहत नाही. अन् हा सगळा एक मानसिक खेळ आहे हेच आपण विसरतो. आणि मानसिक समस्यांची साखळीच सुरू होते. वेळीच हे टाळायचे असल्यास रोज एकदातरी अहांकरा शी जोडलेले सर्व धागे शिथिल करावे आणि वैश्विक पातळीवरील आपल्या सूक्ष्म अस्तित्वाचे स्मरण करावे.

Thursday 8 July 2021

Cultivating calmness and focus in daily life will make a huge difference in life. Quote #TM384

 Quote #TM384


Cultivating calmness and focus in daily life will make a huge difference in life.

Mostly human tendencies are reactive and expressive, and that’s fine. But when  focus and calmness are not accompanied by these two, they create blunders. Your mind is capable enough to prove that what you are thinking is true and it compels you to react without wasting any time. The important thing is to pause for a moment and rethink the topics. The few moments spent to stop and think before the reaction can change the course of life.


सुविचार ३८४

दैनंदिन जीवनात लक्ष केंद्रित केल्यास आणि शांत वृत्ती जोपासल्यास आयुष्यात मोठा फरक पडेल.

मुख्यतः मानवी प्रवृत्ती प्रतिक्रियात्मक आणि व्यक्त होण्यास अधीर असतात आणि ते ठीक आहे. परंतु जेव्हा या दोन्हीं सोबत एकाग्रता आणि शांतवृत्ती नसते तेव्हा ते दोष निर्माण करतात. आपलेच म्हणणे सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी आपले मन पुरेसे सक्षम आहे आणि थोडा हि वेळ न घालवता तशी प्रतिक्रिया देण्यास हेच मन भाग पाडते. एक निमिषभर थांबून विषयांवर पुनर्विचार करणे ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. प्रतिक्रिये आधी थांबून विचार करण्यासाठी वापरलेले काही क्षण जीवनाचा मार्ग बदलू शकतात.

Wednesday 7 July 2021

Know instead of believing. Quote #TM383

Quote TM#383

Know instead of believing.

The world is full of believers and a lot of time their unexamined beliefs stand as an obstacle in the way of making the world conscious. Many people believe something that is concluded by someone else, it would be appropriate to use such a conclusion as a reference point, but believing in it without questioning or experiencing the concluded facts should not be endorsed. Once you become a knower of the known, the knowledge may be incorporated to form a matrix of mind's clarity, but it is dangerous to believe and learn without thinking. This is a hidden but future threat for generations.


सुविचार ३८३

विश्वास ठेवण्याऐवजी जाणून घ्या.

जग विश्वास ठेवणाऱ्यानी भरलेले आहे आणि असे लोक जागरूकता प्राप्त करण्याच्या मार्गावरील सर्वात मोठे अडथळे बनत आहेत. खूप लोक अश्या गोष्टींवर विश्वास ठेवतात जे इतर कुणाचे तरी निष्कर्ष असतात मात्र अद्याप  त्यांनी स्वत: अनुभवलेले नसतात.  हे निष्कर्ष संदर्भ म्हणून वापरणे योग्य ठरेल, परंतु अंतिम निष्कर्ष म्हणून विश्वास ठेवने योग्य नाही. आपणच स्वतः  जागरुकतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नंतर, ते ज्ञान अंतर्भूत केले जाऊ शकते, परंतु विचार न करता विश्वास ठेवणे आणि जाणून घेणे धोकादायक आहे. दीर्घ काळासाठी हा एक छुपा स्वरूपाचा धोका आहे.

Tuesday 6 July 2021

If you could listen to the intent, you can offer better resolution. Quote #TM382

Quote #TM382

*If you could listen to the intent, you can offer better resolution*

Words carry fewer expressions therefore relying on words can limit our perception.
The intent is something that hardly gets expressed through words.
Understanding the intent is an invisible job done by our consciousness.
The higher the degree of consciousness, the higher the chances of comprehending true intent.

सुविचार #३८२

 *आपण हेतू ऐकता आल्यास असल्यास त्यास अधिक चांगला प्रस्ताव देऊ शकता*

शब्दांतून होणारी अभिव्यक्ती फारच कमी असते म्हणून फक्त शब्दांवर अवलंबून राहून आपली समज मर्यादित होऊ शकते.
 हेतू अशी एक गोष्ट आहे जी शब्दांद्वारे महत्प्रयासाने व्यक्त होते. हेतू समजून घेणे हे आपल्या चेतनेद्वारे केलेले एक अदृश्य काम आहे.
 चेतनाची डिग्री जितकी जास्त असेल तितकी वास्तविक हेतू समजून घेण्याची शक्यता जास्त आहे.

Monday 5 July 2021

An inclusive perspective can solve many problems. Quote #TM381

Quote #TM381

*An inclusive perspective can solve many problems.*

Perspective is the culmination of the physical and mental episodes one has witnessed.
Therefore, rather than judging anyone's perspective under a category of right or wrong, one should test whether the perspective is applicable under the available circumstances or not. Also If your perspective is not comprehensive in any circumstance, you need to re-evaluate it.

सुविचार ३८१

 *सर्वसमावेशक दृष्टीकोन अनेक समस्यांचे निवारण करू शकतो.*

प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन त्याच्यासोबत घडणाऱ्या भौतिक आणि मानसिक क्रियांचा परिपाक असतो.
म्हणून कोणताही दृष्टीकोन बरोबर अथवा चूक असा गृहीत धरण्यापेक्षा, उपलब्ध परिस्थितीत लागू पडणारा आहे कि नाही याची चाचणी करावी. जर आपला दृष्टीकोन सर्वसमावेशक नसेल तर पुन्हा पडताळणी करणे गरजेचे आहे.

Sunday 4 July 2021

Our tendencies shape our future. Quote #TM 380

Quote #TM 380
*Our tendencies shape our future.*

Tendencies are formed and hold the mind very tight. And determine the course of life. Since the tendencies are very rigid, it is not easy to change them. But what we spend most of our time on depends on what kind of tendency we are going to be enslaved to.
So choose your internal and external environment carefully.

सुविचार ३८०

*आपल्या प्रवृत्तीच आपले भविष्य घडवत असतात.*

प्रवृत्ती निर्माण होतात आणि मनाला खूप घट्ट पकडून राहतात. आणि आयुष्याचा मार्ग निर्धारित करतात. प्रवृत्ती अतिशय चिवट असल्याने त्या बदलवणे सोपे नसते. मात्र कोणत्या गोष्टींवर आपण जास्त वेळ घालवतोय यावर अवलंबून आहे कोणत्या प्रकारच्या प्रवृत्तीचे आपण गुलाम बनणार आहोत.
म्हणूनच आपले अंतर्गत आणि बाह्य वातावरण काळजीपूर्वक निवडावे.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...